जान्हवी किल्लेकरकडे प्रेक्षकाकडून नुकसान भरपाईची मागणी; नेमकं काय आहे प्रकरण?
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. दररोज बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा आणि नवीन वाद पहायला मिळत आहेत. तर 'भाऊचा धक्का' एपिसोडचीही प्रेक्षकांमध्ये चर्चा होतेय.
'भाऊच्या धक्क्या'वरील 'महाराष्ट्र बोलतोय' या विशेष सेगमेंटची प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता असते. या सेगमेंटमध्ये रितेश हा विविध स्पर्धकांबद्दल सोशल मीडियावर आलेले कमेंट्स वाचून दाखवतो.
रविवारच्या भाऊचा धक्काच्या एपिसोडमधील 'महाराष्ट्र बोलतोय' या विशेष सेगमेंटमध्ये रितेश देशमुख हा जान्हवी किल्लेकरला तिच्याबद्दल आलेली एक कमेंट वाचून दाखवणार आहे.
जान्हवीमुळे एका व्यक्तीचं 3568 रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने जान्हवीकडे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर नुकसान भरपाई करण्याची विनंती केली आहे.
'जान्हवी, बाहेर आल्या आल्या मला तुमचा नंबर द्या. कारण तुमच्यामुळे माझं 3568 रुपयांचं नुकसान झालंय. मी नवीन काचेचा डिनर सेट घेतला होता. तो बायको हातात घेऊन उभी होती आणि त्याच वेळी तुम्ही घनश्यामवर ओरडलात,' असं त्या युजरने लिहिलंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List