‘खासदार म्हणून नाही तर…’; भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर वरुण गांधींचं पिलीभीतवासियांना भावनिक पत्र

‘खासदार म्हणून नाही तर…’; भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर वरुण गांधींचं पिलीभीतवासियांना भावनिक पत्र

भाजपने पक्षाचे नेते खासदार वरुण गांधी यांना उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधील त्यांच्या लोकसभेच्या जागेवरून लढण्यासाठी तिकीट देण्यात आले नाही. यानंतर वरुण गांधी यांनी मतदारसंघातील लोकांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे की ‘माझा कार्यकाळ संपत असला तरी… माझे नाते (तुमच्याशी) माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत संपू शकत नाही.’

वरुण गांधी यांनी असंही म्हटलं की, ‘पीलीभीतच्या महान लोकांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि त्यांचा आदर्श, साधेपणा आणि दयाळूपणा… माझ्या संगोपनात आणि विकासात खूप मोठे योगदान आहे. तुमचा प्रतिनिधी असणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे आणि मी तुमच्या हितसंबंधांना नेहमी माझ्या क्षमतेनुसार प्राधान्य दिले आहे’, असं भाजप नेते म्हणाले.

‘खासदार म्हणून नाही तर मुलगा म्हणून मी आयुष्यभर तुमची सेवा करण्यास कटिबद्ध आहे आणि पूर्वीसारखेच माझे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले राहतील… मी राजकारणात आलो ते सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि आज हे काम सदैव करत राहण्यासाठी मी तुमचा आशीर्वाद घेतो, किंमत कितीही असो’, असंही ते म्हणाले.

वरुण गांधींनीही त्यांच्या पत्रात जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी सांगितलं की अवघ्या तीन वर्षांचे असताना 1983 मध्ये त्यांची आई मनेका गांधींसोबत त्यांनी पिलीभीतला भेट दिली होती. तेव्हापासूनच ते या मतदारसंघात येत होते.

‘…मला आठवतंय तो तीन वर्षांचा मुलगा, जो 1983 मध्ये पहिल्यांदा पिलीभीतला आला होता, तो आपल्या आईचं बोट धरून होता. त्याला काय माहित होतं की हीच भूमी त्याची कर्मभूमी होईल आणि इथली माणसं त्याचं कुटुंब बनतील?’

‘पिलीभीत आणि माझ्यातील नाते हे प्रेम आणि विश्वासाचे आहे… जे कोणत्याही राजकीय गणितापेक्षा खूप वरचे आहे. मी तुमचाच होतो, आहे आणि राहीन…’ असं गांधी यांनी म्हटलं आहे.

वरुण गांधी हे पिलीभीतचे दोन वेळा खासदार आहेत, त्यांचे 1989 पासून कौटुंबिक संबंध आहे, जेव्हा ते त्यांच्या आई मनेका गांधी यांनी जिंकले होते. प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्त्या आणि माजी केंद्रीय मंत्री, श्रीमती मनेका गांधी या सहा वेळा या जागेवर विजयी झाल्या आहेत.

2019 च्या निवडणुकीत मनेका गांधींनी समाजवादी पक्षाच्या हेमराज वर्मा यांना 2.55 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केलं. पण यावेळी, भाजपनं गांधींचं नाव पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, अलीकडच्या काळात 44 वर्षीय वरुण गांधी यांनी त्यांच्याच पक्षाच्या सरकारवर आणि धोरणांवर टीका केली आहे. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी आफ्रिकेतून चित्यांच्या आयातीवरून भाजपवर टीका केली होती. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये अवघ्या पाच महिन्यांत नऊ चित्त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची टिका प्रसिद्ध झाली होती.

X वर, त्यांनी हिंदुस्थानात आणल्या जाणाऱ्या चित्त्यांबद्दलच्या बातम्यांना टॅग करत म्हटलं होतं की, ‘आफ्रिकेतून चित्ते आयात करणे आणि नऊ जणांना परदेशी भूमीत मरण्याची परवानगी देणे… हे निष्काळजीपणाचं भयंकर प्रदर्शन आहे’.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘माझी लाईन विसरायची…’, शाहिद सोबत रोमान्स, मृणाल ठाकुर म्हणाली… ‘माझी लाईन विसरायची…’, शाहिद सोबत रोमान्स, मृणाल ठाकुर म्हणाली…
अभिनेत्री मृणाल ठाकुर हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे....
श्रीराम यांच्या वेशात रणबीर तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी; ‘रामायण’च्या सेटवरील फोटो लीक
एकाच्या गर्लफ्रेंडसाठी मला चित्रपटातून..; प्रियांका चोप्राने कोणावर साधला निशाणा?
मेकअप रुम बंद केल्यानंतर… ‘ये हैं मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीचे निर्मात्यावर गंभीर आरोप
मराठी गाणं जगात गाजवलं; ‘गुलाबी साडी’ गाणं झळकलं ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर
तारक मेहताच्या ‘सोढी’च्या अपहरणाचे गूढ ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजमुळे वाढले, मुंबई नव्हे तर..
घटस्फोटानंतर दुसरे लग्न न करता ‘या’ अभिनेत्री जगत आहेत एकट्या आयुष्य, करिश्मापासून ते..