उन्हाचा पारा वाढला… तरीही पंढरी गजबजली

चैत्री वारी कामदा एकादशीचा मुख्य सोहळा मंगळवारी लाखो भाविकांच्या उपस्थित हरिनामाच्या जयघोषात पार पडला. चार लाख भाविकांनी उन्हाळ्याचे दिवस असूनही उपस्थिती लावली. यामुळे पंढरी नगरीं भाविकांनी गजबजली आहे. दर्शन रांगेत सुमारे 1 लाखांहून अधिक भाविक उभे होते. सध्या सोलापूर जिह्यातील तापमानाने 40शी पार केली आहे. अशा रणरणत्या उन्हातही श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मुखदर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेतही हजारो भाविक उभे आहेत. ही दर्शन रांग पत्राशेडमध्ये पोहोचलेली आहे. तर मंदिर परिसरात कळस दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. स्नानासाठीदेखील आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंट फुलून गेले आहे. पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने खिचडी, चहा, पाणी, ताक, मठ्ठा आदींची मोफत व्यवस्था करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List