ईडी, सीबीआय, आयटीचा राजकीय हत्यार म्हणून वापर

ईडी, सीबीआय, आयटीचा राजकीय हत्यार म्हणून वापर

आज केंद्र सरकार ईडी, सीबीआय आणि आयटीचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहे. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान स्वतः करतात. निवडणुकीच्या दोन महिने आधी काँग्रेसची बँक खाती गोठवली जातात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाते. विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जातात, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी आज तामीळनाडूतील तिरुनेलवेली येथील प्रचार सभेत मोदी सरकारच्या दडपशाही आणि हुकूमशाहीविरोधात कडाडले. देशात विचारधारेचे युद्ध सुरू असून एका बाजूला न्याय, स्वातंत्र्य आणि समता आहे, तर दुसऱया बाजूला आरएसएस, मोदी आणि त्यांचे सरकार आहे, असे ते म्हणाले.

1 लाखांहून अधिक शेतकऱयांच्या आत्महत्या

देशात रोज 30 शेतकरी आत्महत्या करत असून भाजपच्या कार्यकाळात तब्बल 1 लाखांहून अधिक शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱयांचे उत्पन्नही दुपटीने वाढले नाही आणि त्यांच्या शेतमालाला किमान हमीभावही मिळाला नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर एक्सवरून घणाघात केला. तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास शेतमालाला हमीभाव देण्यासह शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस
सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!
कायदेशार सल्ला – परस्पर संमतीने घटस्फोट महत्त्वाचा
मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…