बंगळुरूनंतर चेन्नईतही पाणीबाणी
एप्रिल महिन्यामध्येच मे महिन्यासारखी पाणीटंचाई शहरांना भेडसावू लागली आहे. बंगळुरूनंतर आता चेन्नई शहरातही पाणीबाणी सुरू झाली आहे. मोठे आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱया चेन्नईवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. चेन्नईतील 43 टक्के लोकसंख्येची तहान भागवणारे सर्वात मोठे वीरानम सरोवर आटले आहे. यंदा तीन महिने आधीच जलसाठे कोरडेठाक पडू लागले आहेत. धरणात केवळ 7.746 टीएमसी पाणी शिल्लक आहे.
1500 टँकरने पाणीपुरवठा
शहरातील अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. लोकांना 1500 रुपये टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. पाण्याचे चुकीचे व्यवस्थापन व हवामान बदलामुळे देशात अनेक शहरातील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List