भाजपलाच निर्यात करून टाका, जाऊ द्या सातासमुद्रापार तडीपार; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

भाजपलाच निर्यात करून टाका, जाऊ द्या सातासमुद्रापार तडीपार; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी रत्नागिरी येथे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटावर जोरदार टीका केली. ”कधी कांद्यांवर निर्यात बंदी, कधी काजू, कधी आंबा; आता तुम्हा या भाजपलाच निर्यात करून सातामुद्रापार तडीपार करून टाका”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला मत म्हणजे विनाशाला मत असा इशारा देखील जनतेला दिला. तसेच इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर कोकणातील बारसू, जैतापूर सारखे विनाशकारी प्रकल्प जमिनीवरूनच नाही तर कागदावरूनही रद्द करून टाकू, असे आश्वासनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

”कोकणात मला प्रचाराची गजर नाही. कोकण हे शिवसेनेचं व ठाकरे कुटुंबाचं हृदय आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरी तुम्ही सोबत आहात. शिवसेना फोडली, चोरली, गद्दाराकडे आमच्या पक्षाचं चिन्ह व नाव दिलं. आता भाजपने त्या गद्दाराची तंगडतोड केली. जागा कापल्या. कोकणातली जागा जी इतक्या वर्षापासून शिवसेनेची होती ती आता भाजपकडे गेली आहे. त्या लाचाऱ्यांना कळलंच नाही की गद्दारांचे जे मालक दिल्लीत बसले आहेत. ते शिवसेनेसोबत कोकणाचं नातं तोडायला निघाले आहेत. त्यांना माहित नाही की कोकणात जांभा दगड आहे. कोणे एक काळी हा दगड लाव्हारस होता. त्याचा पुन्हा लाव्हारस होणार नाही असं नाही. आज महाराष्ट्रात भाजपविरोधात लाव्हारस उफाळून वर आलेला आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

”सध्या आयपीएलचे दिवस सुरू आहेत. मॅच बघताना पंचायत होते. की हा खेळाडू या संघात होता. आता तो त्या संघात गेला. असंच देशाच्या राजकाराणात झालं आहे. आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटीकल लीग झाली आहे.. मोदींना आता सूर लागत नाहीए. ते कितीही काही बोलले तरी मोदींचा जो आधी आत्मविश्वास होता तो आता दिसत नाही. पहिल्यांदा आपणही फसलो होतो. शिवसेना सोबत होती तेव्हा काय रुबाब होता त्यांचा . त्यांचं एक वाक्य होतं एक अकेला सबपे भारी. आता त्या 56 इंजांच्या छातीतील हवा निघून गेली आहे. काय ही गत झाली आहे. हे सर्व बघून अटलजींचा आत्मा वर रडत असेल. अटलजी म्हणाले होते अशी सत्ता जर मला मिळत असेल तर मी ती चिमटीत देखील पकडणार नाही. आता ते विचार करत असतील ती कुठल्या नाकर्त्याकडे पक्ष गेलाय. शिवसेना तुमच्यासोबत होती. तेव्हा किती वेळा तुम्हाला यावं लागायचं. किती सभा घेतल्या होत्या तुम्ही. विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाश होणार असेल तर विपरीत बुद्धी होणारच. हा देवाचा आशिर्वाद, नियतीचा संकेत आहे. त्यांनीच आम्हाला त्यांच्यापासून दूर केलंय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना, चिन्ह चोरलं. मला इथे बसलेल्या सगळ्यांचा अभिमान आहे. समोर जो उभा आहे. की टोप घालताना खाजवून विचार करावा लागत असेल की आज कोणत्या पक्षात आहोत आपण. आठवतच नाही त्यांना. इतके वर्ष स्वत:सकट स्वत:ची पिलावळी सहीत जिथे सत्ता तिथे तुम्ही झुकता. यांनी एक तरी लघु किंवा सुक्ष्म तुमच्या साईजप्रमाण प्रकल्प कोकणात आणला आहे का. भाजपने यांना त्यांच्या कुवतीप्रमाणेच मंत्रालय दिलं आहे. आता निवडणूकीनंतर हे अतिसूक्ष्म होतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

”आज तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून आमच्याशी लढायला निघालात. हे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. हे माझं वैभव आहे. ही समोर बसलेली जनता माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. आमची घराणेशाही मंजूर आहे. सभेत शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावता ते चालतं. नालायक लोकं तुम्ही माझा धनुष्यबाण चोरता, पक्ष चोरता. आणि माझ्या वडिलांचा फोटो लावता. तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते. कुणाची घराणेशाही तुम्ही पोसताय. कोकण सुसंस्कृत आहे. काल परवाकडे फड़णवीस येऊन गेले की ते म्हणतात आम्हाला मत म्हणजे काँग्रेसला मत. जर कोकणात शिवसेना उभी राहिली नसते. तर आज कोकणता गुंडाराज असता. बारसू मध्ये माता भगिनींना मराहाण केली तेव्हा शिवेसना मध्ये पडली नसती तर हा विषय यांनी संपवला असता. आपलं सरकार आल्यानंतर बारसू जैतापूर मध्यै फौजा उभ्या करू हेच यांच्या डोक्यात आहे. त्यांचा गुंड पद्धतीने यांना कोकण स्वत:च्या विळख्यात घ्यायचा असून तशीच बारसूची रिफायनरिही उभी करतील हे लोक. आमचं सरकार आल्यावर आम्ही कोणताही विनाशकारी प्रकल्प कोकणात येणार नाही. फक्त जमिनीवरच नाही तर कागदावरूही तो प्रकल्प हटवून टाकेन. त्यांना मत म्हणजे विनाशाला मत. एका बाजूला विनायक आहे तर दुसऱ्या बाजूला विनाश आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत वादळाची धुळवड!ताशी 60 किमी वेगाने वारे आणि अवकाळी पाऊस मुंबईत वादळाची धुळवड!ताशी 60 किमी वेगाने वारे आणि अवकाळी पाऊस
उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबई-ठाणेकरांना आज धुळीचे भयंकर वादळ आणि जोरदार पावसाने तडाखा दिला. नवी मुंबईसह महानगराच्या विविध भागांत वादळी पाऊस...
प्रचार थांबवून अनिल देसाई मदतीला धावले
सामना अग्रलेख – शहा आता ‘पीओके’ आणणार!
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कु्मार मोदी यांचे निधन
ऑर्डर कॅन्सल करणे ‘स्विगी’ला महागात, ग्राहकाला नुकसानभरपाई देण्याचे कोर्टाचे निर्देश
बोगस मतदारांचा सुळसुळाट; ईव्हीएम अनेक ठिकाणी बंद, चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 59.64
प्रासंगिक – ‘होरायझन’