सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

फक्त गुजरातच्याच कांद्याला निर्यातीची परवानगी देण्याचा निर्णय बॅकफायर होताच आज घाईगडबडीने केंद्र सरकारने 99,150 मॅट्रिक टन कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. हे प्रमाण फार कमी आहे, सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे होती. सरकारची घोषणा म्हणजे दर्यात खसखस असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टोला लगावला.

आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते म्हणाले की, खरंतर ही बंदी सहा महिन्यांआधीच उठवायला पाहिजे होती पण आधी सरकारने मोठ्या व्यापाऱ्यांचा विचार केला, नंतर गुजरातचा विचार केला आणि शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला आहे का अशी शंका येते.

नाशिक, नगर, पुणे या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे 400 पारची घोषणा करणाऱ्यांना 150 तरी मिळतील का अशी भीती वाटत आहे म्हणून हा निर्णय घेतला असावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात
भाजपचे उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी रात्री राडा झाला होता. मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप...
धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत! मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप
मतदानाचा पाचवा टप्प्याच्या तेरा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
महाराष्ट्रातील 5 वा आणि अंतिम टप्प्यातील प्रचार थांबला, सोमवारी मतदान
चार जून नंतर जुमला युग संपणार, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
पुण्यात पुन्हा एक भलेमोठे होर्डिंग कोसळले, घोडा गंभीर जखमी
एकेकाला का अटक करता, आम्ही सगळेच भाजप मुख्यालयात येतो! अरविंद केजरीवाल यांचे मोदींना आव्हान