हा ठरला मुंबईतील गेल्या 15 वर्षांतील सर्वात उष्ण दिवस

हा ठरला मुंबईतील गेल्या 15 वर्षांतील सर्वात उष्ण दिवस

राज्यात अनेक ठिकाणी पारा 40 अंशावर गेला असून मंगळवारी मुंबई देखील 40 अंशावर पोहोचली होती. मुंबईचे कमाल तापमान 39.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. 2009 पासून एप्रिलमधील सर्वात उष्ण दिवस ठरला, असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले.

16 एप्रिल रोजी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 39.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कुलाबा वेधशाळेने 35.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले. 15 वर्षांपूर्वी म्हणजेच 2 एप्रिल 2009 रोजी मुंबईतील तापमान 40.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. त्यानंतर 16 एप्रिल 2024 मध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले.

गेले तीन दिवस IMD ने मुंबई आणि शेजारील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले.

बुधवारी तापमानात घट झालेली पाहावयास मिळाली. मात्र वाढलेल्या आर्द्रेतेमुळे मुंबईकरांना चांगलाच घाम फुटला होता. कुलाबा व सांताक्रुझ वेधशाळांमध्ये अनुक्रमे 78 टक्के आणि 71 टक्के सापेक्ष आर्द्रता नोंदवली गेली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस
सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!
कायदेशार सल्ला – परस्पर संमतीने घटस्फोट महत्त्वाचा
मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…