लखनऊच्या आदित्य श्रीवास्तवची यशोगाथा

लखनऊच्या आदित्य श्रीवास्तवची यशोगाथा

 

लखनऊमध्ये राहणाऱया आदित्य श्रीवास्तव याने वयाच्या 26 व्या वर्षी यूपीएससीच्या परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. आयआयटी कानपूरचा विद्यार्थी असलेल्या आदित्यला इंजिनीअरिंगनंतर एका अमेरिकन कॉर्पोरेट पंपनीत वार्षिक 40 लाखांचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली होती, पण डेस्क वर्कमध्ये अजिबात रस नसल्याने त्याचे या नोकरीत मन स्थिरावत नव्हते. कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी केव्हाही मिळू शकते. सामाजिकरीत्या देशाशी कनेक्ट होण्यासाठी आदित्यने या नोकरीवर पाणी सोडून यूपीएससी तयारी सुरू केली आणि तिसऱया प्रयत्नात देशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. आदित्य याने 40 लाखांच्या पॅकेजची नोकरी ते यूपीएससीत टॉप केल्यापर्यंतची यशोगाथा एका मुलाखतीत सांगितली आहे.

मुलाखतीत 60 टक्के प्रश्न पोलीस सेवेवर आधारित होते. त्यानंतर आपली आवड लक्षात घेऊन प्रश्न विचारले जातातडायनासॉरमध्ये मला विशेष रस असल्यामुळे मुलाखतीत मला त्यावर आधारित प्रश्न मला विचारले.

 

स्थिरता यशाचा मंत्र!

स्थिरता हाच माझ्या यशाचा मंत्र आहे. हा खूप मोठा प्रवास आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये स्थिरता असणे आवश्यक आहे. तुम्ही आधी टार्गेट सेट करा. तिथपर्यंत जाण्यासाठी कष्ट घ्या. या प्रवासात तुमच्यामध्ये असणाऱया उणिवा भरून काढण्याकडे कल ठेवा, असा मंत्र या वेळी आदित्यने यूपीएससीची तयारी करणाऱया उमेदवारांना दिला. 

स्मार्टवर्कची गरज

यूपीएससीसारख्या परीक्षा व्रॅक करण्यासाठी हार्डवर्क नाही, तर स्मार्टवर्कची गरज असल्याचे आदित्य म्हणाला. यूपीएससीची तयारी करताना मी मागील दहा वर्षांच्या पेपर्सचे विश्लेषण केले, असे आदित्यने सांगितले.

अभ्यासासाठी दिनक्रम

हैदराबादमध्ये मी यूपीएससीची तयारी करतोय. अॅपॅडमीमध्ये पहाटे 5 वाजता ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतचे शेडय़ूल असते. त्यानंतर मी यूपीएससीची तयारी करायचो. संध्याकाळीच मला स्वअध्ययनासाठी वेळ मिळायचा. मी कुणालाही टिप्स देऊ इच्छित नाही. कोणी काय करावे, काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त प्रत्येकाने आपल्या ध्येयावर लक्ष पेंद्रित करणे आवश्यक असल्याचे तो म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले
दहा वर्षीय मुलाच्या निघृण हत्येने उरण हादरले आहे. सुरक्षारक्षकाने लहान मुलांना कंपनीत नो एण्ट्री असल्याचे सांगितल्याने पित्याने मुलाला आपल्या जवळच्या...
ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरमध्ये महाविकास आघाडीच बाजी मारणार; भाजपच्या जुमल्यांना, गद्दारांना मतदार जागा दाखवणार
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची 60 लाखांची फसवणूक; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षांविरुद्ध पकड वॉरंट
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांचा महाविकास आघाडीला पाठिंबा
पैसे वाटपाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे मौन
लोकलच्या गर्दीत धक्का लागून मृत्यू हा अपघातच! रेल्वे मंत्रालयाला हायकोर्टाचा दणका
पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला