जालन्यात प्रेम प्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण; मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
जालन्यात प्रेम प्रकरणातून तरुणाला काही इसमांनी 14 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास मारहाण केली होती. यात वीरेंद्र महेंद्र शेळुते रा. ईंदेवाडी जालना यांना बेदम मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तरुणाचा बुधवारी 17 एप्रिल रोजी रात्री उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे मृत तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी आज गुरूवारी या तरुणाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून कदीम जालना पोलीस ठाण्यात आणला आणि जो पर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिला होता.
याप्रकरणी मयताचा भाऊ विजेंद्र शेळूते यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली. मयताच्या भाऊ विजेंद्र यांच्या फिर्यादी नुसार मयत विरेंद्र याचा खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली. नेमकी घटना कोठे घडली याचा शोध लागला नसून या प्रकरणात पाच आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली. यांनतर मयत तरुणाच्या नातेवाईकांनी मयत इसमाचा मृतदेह ताब्यात घेतलाय. याप्रकरणी 5 संशयित आरोपींविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List