चंद्रपूरच्या माजरी गावात अन्नातून विषबाधा; 150 जण रुग्णालयात दाखल

चंद्रपूरच्या माजरी गावात अन्नातून विषबाधा; 150 जण रुग्णालयात दाखल

चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत सुमारे 150 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

माजरी येथे शनिवारी नवसाची पूजा ठेवण्यात आली होती. या पुजेनिमित्त रात्री गावात जेवण ठेवण्यात आले होते. या पुजेत आणि जेवणात सुमारे 500 जण सहभागी झाले होते. गावकऱ्यांनी जेवण केले आणि ते घरी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अनेकांना अस्वस्थ वाटू लागले. सुमारे 100 जणांना असा त्रास होता. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचे समजले. त्यानंतर विषबाधा झालेल्यांची संख्या वाढत गेली.

आतापर्यंत सुमारे 150 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावातील आणि जवळील रुग्णालयात जागा नसल्याने अनेकांना भद्रावती आणि वरोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम ठेवताना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. या विभागाशी संपर्क साधला असता अन्न व औषध प्रशासन अधिकारी गिरीश सातकर यांनी यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी जात असून नेमके कारण चौकशीनंतर स्पष्ट होईल, असेही सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय? देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना काय म्हणायचे...
मिस्टर राज… टीकेनंतर सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर; रमेश किनी हत्याकांडाचा उल्लेख करत म्हणाल्या…
अजित पवारांना शरद पवार ‘व्हिलन’ बनवत होते, कारण… देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट
‘घरोघरी मातीच्या चुली’मधील ऐश्वर्या-सारंगच्या लग्नातील पैठणी थीमची चर्चा
Amitabh Bachchan : विवाहित असतानाही ‘या’ अभिनेत्यासोबत होतं अमिताभ बच्चन यांच्या लेकीचं अफेअर!
स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अनेकांची निराशा
‘या’ अभिनेत्रींनी मोडला श्रीमंत पुरुषांचा संसार, त्यानंतर केलं लग्न, एकीची सवत तर प्रसिद्ध अभिनेत्री