नगरमधील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती, मुकुंदनगरमध्ये आठ दिवसांपासून पाणी नाही

नगरमधील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती, मुकुंदनगरमध्ये आठ दिवसांपासून पाणी नाही

नगर शहरातील मुकुंदनगर येथील गोविंदपुरा भागातील बडी मरियम मशिदीच्या मागील परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यामुळे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. रोजाच्या सहेरीसाठी पहाटे चार वाजता उठावे लागते. यानंतर महिलांना दिवसभर रोजामध्ये घरातील कामे करावी लागतात. मात्र, या भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. या परिसरातील नागरिकांना भरउन्हात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

ठेकेदारामुळे पाणीबाणीची वेळ

या परिसरात महापालिकेने सिमेंटचा रस्ता केला आहे. हा रस्ता करताना ठेकेदाराने भूमिगत गटारीचे चेंबर बंद करून टाकले आहे. तसेच रस्त्याचे हे काम करताना बडी मरियम मशीदच्या मागील गल्लीमधील नागरिकांचे नळजोड तोडून टाकले आहेत. यामुळे येथील घरांना गेल्या आठ दिवसांपासून पाणी आलेले नाही. नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्याने येऊन पाहणी केली आणि आजच तुम्हाला पाणी येईल, असे आश्वासन दिले. परंतु अद्यापि नागरिकांना पाणी मिळाले नाही.

मैलामिश्रित पाणी रस्त्यावर

या भागातील रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने बडी मरियम मशीदच्या मागील गल्लीमधील ड्रेनेजच बंद केले. यामुळे या गल्लीमधील रस्त्यांवर ड्रेनेजचे मैलामित्रित पाणी साचले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई लुटणाऱयांना जेलमध्ये पाठवू! आदित्य ठाकरे यांचा भाजप आणि मिंध्यांना इशारा मुंबई लुटणाऱयांना जेलमध्ये पाठवू! आदित्य ठाकरे यांचा भाजप आणि मिंध्यांना इशारा
मुंबईला जपणे, जोपासण्याचे काम शिवसेनेने केले आहे. बेस्ट, विजेचे माफक दर, 500 फुटांपर्यंतची घरे करमुक्त केली, मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाला...
विज्ञान-रंजन – हॅट्स ऑफ, व्हॉएजर!
राज ठाकरे परप्रांतीयांच्या लोंढय़ांवर बोलताच मिंध्यांना टेन्शन
मोदींची वाराणसीतील एकाही गावाला ना भेट, ना विचारपूस
रायबरेलीत अमित शहा यांच्या सभेत पत्रकाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सभेसाठी पैसे दिले होते का? विचारताच हल्ला
लोकशाहीवर विश्वास नसणारे भाजप सरकार हद्दपार करा; शरद पवार यांची कल्याणमध्ये विराट सभा
दिल्ली डायरी – धडधड, धाकधूक आणि घबराट…!