पावसाळ्यात अधिकचे मनुष्यबळ, यंत्रणा तैनात करा

पावसाळ्यात अधिकचे मनुष्यबळ, यंत्रणा तैनात करा

पावसाळा दीड महिन्यांवर येऊन ठेपल्याने पाकसाळापूर्व कामे वेगाने पूर्ण करावीत आणि पावसाळ्यात मुंबईकरांना कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी पावसाळ्यात अधिकचे मनुष्यबळ यंत्रणा तैनात करा, असे निर्देश पालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दिले. पालिकेच्या 25 वॉर्डात सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात आले, त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासह स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी सखोल स्वच्छता मोहीम सातत्याने व जोमाने सुरू राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शनिवारी ए विभागातील कुलाबा परिसरातील कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग येथून स्वच्छता मोहिमेस सुरूवात झाली. त्यानंतर सी विभागातील मुंबादेवी मंदीर परिसरात अग्यारी गल्ली येथे भेट देवून आयुक्तांनी स्कत: स्वच्छता कार्यात सहभाग घेतला. एच पश्चिम विभागात वांद्रे पश्चिममध्ये लीलावती रुग्णालय परिसर, एच पूर्व विभागात सांताक्रूझ पूर्व भागात प्रभात कॉलनी, एल विभागात साकी विहार रस्ता, एस विभागात हिरानंदानी जंक्शन या ठिकाणी गगराणी यांनी स्वच्छता मोहिमेतील कामांची पाहणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्रीचं कार अपघातात निधन, बहिणीसोबत तीन जण गंभीर जखमी प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्रीचं कार अपघातात निधन, बहिणीसोबत तीन जण गंभीर जखमी
झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचं अपघातात निधन झालं आहे. या अपघातात अभिनेत्रीच्या बहिणीसोबत अन्य तीन...
Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रात किती जागांवर मतदान?
मुंबई लुटणाऱयांना जेलमध्ये पाठवू! आदित्य ठाकरे यांचा भाजप आणि मिंध्यांना इशारा
विज्ञान-रंजन – हॅट्स ऑफ, व्हॉएजर!
राज ठाकरे परप्रांतीयांच्या लोंढय़ांवर बोलताच मिंध्यांना टेन्शन
मोदींची वाराणसीतील एकाही गावाला ना भेट, ना विचारपूस
रायबरेलीत अमित शहा यांच्या सभेत पत्रकाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सभेसाठी पैसे दिले होते का? विचारताच हल्ला