Palghar News – दुसऱ्या मुलाशी बोलत असल्याच्या संशयातून प्रियकराकडून प्रेयसीवर हल्ला, आरोपीला अटक

Palghar News – दुसऱ्या मुलाशी बोलत असल्याच्या संशयातून प्रियकराकडून प्रेयसीवर हल्ला, आरोपीला अटक

दुसऱ्या मुलाशी व्हॉट्सअपवर बोलत असल्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीवर चाकूहल्ला केल्याची घटना विरारमध्ये घडली. तरुणीच्या हातावर, मनगटावर वार करण्यात आले असून, तिचा जबडाही फ्रॅक्चर झाला आहे. तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. अक्षय जनार्दन पाटील असे आरोपीचे नाव आहे.

अक्षय आणि पीडित तरुणीचे प्रेमसंबंध होते. दोघांचे लग्नही ठरले होते. मात्र प्रेयसी दुसऱ्या मुलाशी व्हॉट्सअपवर बोलते असा अक्षयला संशय होता. या संशयातून त्याने तरुणी काम करत असलेल्या मेडिकल स्टोर्समध्ये जाऊन तिच्यावर चाकूने हल्ला केला. तसेच जबड्यावर लाथ मारून फ्रॅक्चर केला.

प्रेयसीवर हल्ला केल्यानंतर आरोपीने तिच्या आईला फोन करून मुलीला मारून टाकल्याचे सांगितले. यानंतर तरुणीच्या वडिलांनी मेडिकल स्टोर्समध्ये येऊन पाहिले असता ती रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट? रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट?
Cricket Rohit Sharma: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याचे मुंबईतील घर भाड्याने दिले आहे. 1,298 वर्ग फुटाचा असलेला...
कोण तू रे कोण तू… जेव्हा राज ठाकरे कवितेतून उलगडतात छत्रपती शिवाजी महाराज
परवा बदलापूर, आज पुणे… शिवरायांच्या राज्यात जो न्याय….; स्वारगेट घटनेवर दिग्दर्शक संतापला
अक्रोड की बदाम… मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी जास्त फायदेशीर काय?
मुंबई- कोकणात उन्हाचे चटके; उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल
फक्त कायदे करून महिला सुरक्षित नाही होणार, पुणे बलात्कार प्रकरणी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया
गुजरातच्या अधिपत्याखाली महायुती सरकारचं काम चाललंय, वैभव नाईकांचा हल्लाबोल