सरकारला महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटत नाही का? कोरटकरच्या अटकेवरून रोहित पवारांचा सवाल

सरकारला महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटत नाही का? कोरटकरच्या अटकेवरून रोहित पवारांचा सवाल

प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र अद्यापही त्याला अटक करण्यात आलेली नाही. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

X वर एक पोस्ट करत रोहित पावर म्हणाले आहेत की, ”छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेल्या कोरटकरला अटक करण्यास पोलीस इतका उशीर का लावत आहेत? तोच कोरटकर जर एखाद्या भाजपच्या वरिष्ठ नेत्याबाबत खालच्या पातळीवर बोलला असता तर, त्याला पोलीसांनी अटक केली नसती का? या सरकारला महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटत नाही का? असा सवाल त्यांनी महायुती सरकारला विचारला आहे.

रोहित पवार म्हणाले आहेत की, ”सत्तेच्या राजाश्रयामुळे कोरटकर वाचवलं जातंय, हे आता लपून राहीलेलं नसून कोरटकरला खुद्द सरकारचंच संरक्षण प्राप्त असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. शिवाय कोल्हापूर पोलीस अटकेसाठी गेले असता नागपूर पोलीसांनी सहकार्य न करता कोरटकरला लपवण्याची भूमिका घेतली, अशीही माहिती पुढं येत आहे. सरकारने यावर खुलासा करावा.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट? रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट?
Cricket Rohit Sharma: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याचे मुंबईतील घर भाड्याने दिले आहे. 1,298 वर्ग फुटाचा असलेला...
कोण तू रे कोण तू… जेव्हा राज ठाकरे कवितेतून उलगडतात छत्रपती शिवाजी महाराज
परवा बदलापूर, आज पुणे… शिवरायांच्या राज्यात जो न्याय….; स्वारगेट घटनेवर दिग्दर्शक संतापला
अक्रोड की बदाम… मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी जास्त फायदेशीर काय?
मुंबई- कोकणात उन्हाचे चटके; उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल
फक्त कायदे करून महिला सुरक्षित नाही होणार, पुणे बलात्कार प्रकरणी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया
गुजरातच्या अधिपत्याखाली महायुती सरकारचं काम चाललंय, वैभव नाईकांचा हल्लाबोल