इडली बनवण्यासाठी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

इडली बनवण्यासाठी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

इडली बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर करण्यावर आता कर्नाटक सरकारने बंदी केली आहे. प्लॅस्टिकमध्ये कर्करोगजन्य घटक असल्याने पुढील धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाने प्लॅस्टिकविरोधी मोहिम तीव्र केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा प्लास्टिकचा वापर करणाऱ्या हॉटेल्सवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात सुमारे 52 हॉटेल्समध्ये इडली बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर करत असल्याचे आढळून आले. आरोग्य विभागाने राज्यभरातून इडलीचे सुमारे 250 वेगवेगळे नमुने तपासले. यापैकी 52 नमुन्यांमध्ये प्लॅस्टिकचा वापर केल्याचे आढळून आले. यानंतर कर्नाटक सरकारने कारवाईचा बडगा उगारत प्लॅस्टिक वापरावर कडक निर्बंध घातले आहेत.

प्लॅस्टिकमध्ये कर्करोगजन्य घटक असतात. प्लॅस्टिकचा वापर इडली बनवताना केल्यास त्यातील कर्करोगजन्य घटक इडलीमध्ये जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्री म्हणाले. आरोग्य विभाग लवकरच असे होऊ नये याबाबत अधिकृत आदेश जारी करेल, असेही त्यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट? रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट?
Cricket Rohit Sharma: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याचे मुंबईतील घर भाड्याने दिले आहे. 1,298 वर्ग फुटाचा असलेला...
कोण तू रे कोण तू… जेव्हा राज ठाकरे कवितेतून उलगडतात छत्रपती शिवाजी महाराज
परवा बदलापूर, आज पुणे… शिवरायांच्या राज्यात जो न्याय….; स्वारगेट घटनेवर दिग्दर्शक संतापला
अक्रोड की बदाम… मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी जास्त फायदेशीर काय?
मुंबई- कोकणात उन्हाचे चटके; उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल
फक्त कायदे करून महिला सुरक्षित नाही होणार, पुणे बलात्कार प्रकरणी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया
गुजरातच्या अधिपत्याखाली महायुती सरकारचं काम चाललंय, वैभव नाईकांचा हल्लाबोल