प्लेट खेचल्या, काउंटर फोडले, जेवणासाठी लोक तुटून पडले; ‘ग्लोबल’ इनव्हेस्टर कार्यक्रमात ‘लोकल’ पुरी-भाजीसाठी रेटारेटी

प्लेट खेचल्या, काउंटर फोडले, जेवणासाठी लोक तुटून पडले; ‘ग्लोबल’ इनव्हेस्टर कार्यक्रमात ‘लोकल’ पुरी-भाजीसाठी रेटारेटी

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी ‘मध्य प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद’ अर्थात ‘MP Global Investors Summit’ पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. या परिषदेला 60हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उद्योगपती गौतम अदानी यांनीही या परिषदेला संबोधित केले. 30 लाख कोटी गुंतवणुकीचे उद्दिष्ट असलेल्या ही परिषद मात्र भलत्याच कारणामुळे गाजली.

मध्य प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेत जेवणासाठी गोंधळ उडाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या परिषदेतीसाठी उपस्थित लोक जेवणाच्या काउंटवर तुटून पडले. पुरी-भाजीच्या प्लेट्स घेण्यासाठी लोक धडपडताना दिसले. यावेळी लोक एकमेकांना धक्काबुक्की करत होते. काहींनी तर थेट जेवणाचे काउंटरच फोडले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी परिषदेच्या आयोजकांवर हल्ला चढवला.

नेमकं काय घडलं?

भोपाळमध्ये आठवी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट आयोजित करण्यात आली होती. पहिला दिवस शांततेत पार पडला, मात्र दुसऱ्या दिवशी कार्यक्रम स्थळी जेवणाच्या काउंटवर गोंधळ उडाला. लोकांनी प्लेट ओढले, काउंटर फोडले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटला हिंदुस्थानातील प्रमुख उद्योजकांसह राजकीय नेतेही उपस्थित राहिलो होते.

काँग्रेसची सरकारवर टीका

दरम्यान, व्हायरल व्हिडीओवर मध्य प्रदेशमधील विरोधी पक्ष काँग्रेसचे माध्यम प्रमुख मुकेश नायक यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने 30 लाख कोटी गुंतवणुकीचा दावा करत आहे आणि दुसरीकडे लोक खाण्यासाठी तुटून पडत आहेत. हा किती विरोधाभास आहे. या परिषदेमध्ये एवढे गरीब लोक आले होते का? असा सवाल त्यांनी केला. तसेच या व्हिडीओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश...
‘झी मराठी’ वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज
‘या’ अभिनेत्रीमुळे देशात वाढली होती कंडोमची विक्री, बदलला लोकांचा दृष्टिकोन
रणबीरला ‘रेड फ्लॅग, वुमनायजर’ म्हणणाऱ्यांसाठी चाहतीची पोस्ट; आलियानेही दिली प्रतिक्रिया
Ashok Ma.Ma : अनिश आणि भैरवीने केले लग्न, ‘अशोक मा.मां’च्या आयुष्यात मोठे संकट
महाबळेश्वरवरील पाण्याचे संकट तात्पुरते टळले, 15 कोटींच्या थकबाकीपैकी पालिकेने 1 कोटी 37 लाख भरले
एलबीटी विभागाला टाळे ठोका, राज्यशासनाचे महापालिकेला आदेश; हजारो कोटींच्या वसुलीबाबत प्रश्नचिन्ह