प्रयागराजचा महाकुंभ पूर्ण होताच मुख्यमंत्री फडणवीसांची पोस्ट; नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात केलं मोठं विधान

प्रयागराजचा महाकुंभ पूर्ण होताच मुख्यमंत्री फडणवीसांची पोस्ट; नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात केलं मोठं विधान

महाशिवरात्रीच्या उत्सवासोबत बुधवारी उत्तर प्रदेशातील महाकुंभ सोहळ्याची पूर्णाहुती झाली. शेवटच्या दिवशी सुमारे दीड कोटीहून अधिक भाविकांनी अमृतस्नानाचा लाभ घेतल्याची माहिती उत्तर प्रदेशमधील प्रशासनाने दिली आहे. तर 45 दिवसांच्या महाकुंभमेळ्यात 66 कोटी लोकांनी पवित्रस्नान केल्याचे सांगण्यात येत आहे. यंदाचा महाकुंभमेळा विविध कारणांनी जगभरात चर्चेचा विषय ठरला. आता सगळ्यांचं लक्षं लागलं आहे ते नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याकडे.

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराज मधील महाकुंभाची पूर्णाहुती होताच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावा केला आहे की, नाशिकचा ‘सिंहस्थ कुंभ मेळा 2027’ देखील अविस्मरणीय असेल.

आपल्या हँडलवर फडणवीसांनी हिंदी भाषेत पोस्ट केली आहे. ‘प्रयागराज के महाकुंभ की पूर्णाहुति!
नासिक का ‘सिंहस्थ कुंभ मेला 2027′ भी होगा अविस्मरणीय!’, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे ते म्हणातात, ‘प्रयागराज येथील सनातनी श्रद्धेचा महान उत्सव ‘महाकुंभ 2025′ ने जगभरात हिंदुस्थानी संस्कृतीचा झेंडा फडकवत जागतिक स्तरावर कीर्ति उंचावली आहे. यामुळे आम्हा सर्वांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. आपल्या या वैभवशाली परंपरेचा दिव्य अनुभव घेण्यासाठी 2027 साली महाराष्ट्रातील नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ…’

दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ पुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या.

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश...
‘झी मराठी’ वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज
‘या’ अभिनेत्रीमुळे देशात वाढली होती कंडोमची विक्री, बदलला लोकांचा दृष्टिकोन
रणबीरला ‘रेड फ्लॅग, वुमनायजर’ म्हणणाऱ्यांसाठी चाहतीची पोस्ट; आलियानेही दिली प्रतिक्रिया
Ashok Ma.Ma : अनिश आणि भैरवीने केले लग्न, ‘अशोक मा.मां’च्या आयुष्यात मोठे संकट
महाबळेश्वरवरील पाण्याचे संकट तात्पुरते टळले, 15 कोटींच्या थकबाकीपैकी पालिकेने 1 कोटी 37 लाख भरले
एलबीटी विभागाला टाळे ठोका, राज्यशासनाचे महापालिकेला आदेश; हजारो कोटींच्या वसुलीबाबत प्रश्नचिन्ह