मोदी सरकार चित्रपट उद्योग उद्ध्वस्त करतेय, राज्यसभेत जया बच्चन यांचा आरोप

मोदी सरकार चित्रपट उद्योग उद्ध्वस्त करतेय, राज्यसभेत जया बच्चन यांचा आरोप

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत चित्रपट उद्योगाचा मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 वरील सर्वसाधारण चर्चेदरम्यान त्यांनी सरकारवर चित्रपट उद्योग उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना चित्रपट उद्योगाला मदत करण्याचे आवाहन करण्यात केलं आहे.

काय म्हणाल्या जया बच्चन?

राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेदरम्यान बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, ‘तुम्ही एका उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सरकारे हे पूर्वीही करत आली आहेत. मात्र आता ते प्रमाणात होत आहे. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांना (चित्रपट उद्योजकांना) बोलावता. त्यांच्यासोबत फोटो काढतात आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. चित्रपट उद्योगाबद्दल तुमचे काय मत होते? जीएसटी बाजूला ठेवा. परिस्थिती इतकी वाईट आहे की, सर्व सिंगल स्क्रीन बंद करण्यात आल्या आहेत. लोक छोट्या पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी जात नाहीत. कारण सगळंच खूप महाग झालं आहे. तुम्हाला हा उद्योग संपवायचा आहे का?”

सरकारवर आरोप करत जया बच्चन म्हणाल्या की, ”आजचे सरकार उद्योग पूर्णपणे नष्ट करू इच्छित आहे. हा एकमेव उद्योग आहे जो हिंदुस्थानला उर्वरित जगाशी जोडतो. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे जगणे कठीण झाले आहे. मी चित्रपट उद्योजकांच्या वतीने बोलत आहे. मी सरकारला चित्रपट उद्योगावर दया दाखवण्याचे आवाहन करत आहे. मी अर्थमंत्र्यांना याचा विचार करण्याची आणि चित्रपट उद्योगाला मदत करण्याची विनंती करते.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

11 वर्षांपासून प्रेम प्रकरण, डिसेंबर महिन्यात लग्न…पण त्यापूर्वीच प्रियकाराचे प्रेयसीवर चाकूने अनेक वार 11 वर्षांपासून प्रेम प्रकरण, डिसेंबर महिन्यात लग्न…पण त्यापूर्वीच प्रियकाराचे प्रेयसीवर चाकूने अनेक वार
प्रेम प्रकरणातून हल्ले होण्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्या आहेत. मुंबईतील विरारमधील प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. 11...
ठाणे महापालिकेचा तो मराठी भाषेबाबतचा जीआर वादात, मनसे आक्रमक, अविनाश जाधव यांचा थेट इशारा
Swargate Crime Updates : स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
मुंबई-कोकणात तापमानाचा कहर; उष्णतेच्या लाटेने मुंबईकर हैराण
Nalasopara Crime News : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! पोटच्या तीन मुलींवर नराधम बापाकडून अत्याचार
विकीची टोपी काढली, मग त्याचा टीशर्ट मागितला; विकीसोबत मस्ती करणाऱ्या चिमुकल्याला ओळखलं का? छावामध्ये आहे खास सीन
प्रशासन काय करत आहे?; स्वारगेट अत्याचार प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप