आप- काँग्रेस एकत्र लढले असते तर दिल्लीचे निकाल वेगळे दिसले असते; फारुख अब्दुल्ला यांचे मत

आप- काँग्रेस एकत्र लढले असते तर दिल्लीचे निकाल वेगळे दिसले असते; फारुख अब्दुल्ला यांचे मत

दिल्ली विधानसभेचे निकाल धक्कादायक आहेत. या निकालाची देशभरात चर्चा होत आहे. त्याचसह ईव्हीएमच्या विसार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच भाजपने मदारयादीत केलेल्या महाघोटाळ्याची आणि वाढवलेल्या बोगस मतदानाचीही चर्चा होत आहे. आता दिल्ली निकालाबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. दिल्ली निवडणुकीत आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर निकाल वेगळे दिसले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

इंडिया आघाडीत एकीची भावना कायम आहे. मात्र, कधीकधी आपण चुका करतो. दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली असती तर निकाल वेगळा असता. काँग्रेस आणि आप यांच्यात आघाडी का झाली नाही, हे आपल्याला माहित नाही. मात्र, आता या मुद्द्यावर इंडिया आघाडीत चर्चा करण्यात येईल. तसेच आघाडीतील एकी टिकवण्यासाठी योग्य ते निर्णय घेण्यात येतील, असेही अब्दुल्ला यांनी सांगितले.

इंडिया आघाडीचे उद्दिष्ट व्यापक आहे. ही आघाडी फक्त निवडणुकीसाठी नाही, तर देशाचे आणि त्याच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी आहे. जनतेत निर्माण झालेला द्वेष संपवण्यासाठी ही आघाडी आवश्यक आहे. आघाडी संविधानाचे रक्षण करेल आणि देशाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साखरपुड्याची गोड बातमी दिली, तर ट्रोलर्स म्हणाले, ‘माझी मुलं ISIS मध्ये भरती होतील’, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा साखरपुड्याची गोड बातमी दिली, तर ट्रोलर्स म्हणाले, ‘माझी मुलं ISIS मध्ये भरती होतील’, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून हिंदी कलाविश्वात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियामणीने 2017 मध्ये लग्न केलं. इव्हेंट मॅनेजर आणि दिग्दर्शक...
सेन्सार बोर्डा, तुला काय कळणार आमच्या व्यथा? काय पुसतो, कोण नामदेव ढसाळ? विद्रोहाच्या मशाली अजून भकभकणार
“तिच्यापासून दूर राहणं पुरुषासाठी कठीण..”; असं कोणाबद्दल बोलला गोविंदा?
“सुनिताची फसवणूक केली तर..”; आईने गोविंदाला आधीच दिली होती वॉर्निंग
“माझ्या कुंडलीत 2 लग्न, सुनीताने यासाठी तयार रहावं…” दुसऱ्या लग्नाबद्दल गोविंदाने स्वत:च सांगितलं होतं
झटपट श्रीमंतीसाठी त्यांनी चोरल्या 11 रिक्षा, दोघांना अटक; सहा गुन्ह्यांची उकल
मोखाड्यात अधिकाऱ्यांना पाझर फुटला, तहानलेल्या गावांत टँकर पोहोचले, अनेक गावपाड्यांना दिलासा