राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला रत्नागिरीत सुरुवात; स्पर्धेत राज्यातील 32 संघ सहभागी

राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला रत्नागिरीत सुरुवात; स्पर्धेत राज्यातील 32 संघ सहभागी

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 21 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते संपन्न झाले. स्पर्धेत राज्यातील 32 संघ सहभागी झाले आहेत.

अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी राजकिरण दळी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे उपसंचालक नरेंद्र तायडे तसेच मान्यवर परीक्षक उपस्थित होते. राज्यगीताने उद्घाटन समारंभ सुरू झाला. नंतर मान्यवरांनी नटराज पूजन, दीप प्रज्वलन करून श्रीफळ वाढविला. सर्व मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटन समारंभास तसेच बालनाट्य पाहण्यासाठी रत्नागिरीतील विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश...
‘झी मराठी’ वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज
‘या’ अभिनेत्रीमुळे देशात वाढली होती कंडोमची विक्री, बदलला लोकांचा दृष्टिकोन
रणबीरला ‘रेड फ्लॅग, वुमनायजर’ म्हणणाऱ्यांसाठी चाहतीची पोस्ट; आलियानेही दिली प्रतिक्रिया
Ashok Ma.Ma : अनिश आणि भैरवीने केले लग्न, ‘अशोक मा.मां’च्या आयुष्यात मोठे संकट
महाबळेश्वरवरील पाण्याचे संकट तात्पुरते टळले, 15 कोटींच्या थकबाकीपैकी पालिकेने 1 कोटी 37 लाख भरले
एलबीटी विभागाला टाळे ठोका, राज्यशासनाचे महापालिकेला आदेश; हजारो कोटींच्या वसुलीबाबत प्रश्नचिन्ह