‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेता दिवाळखोरीत; शेतीची वाट धरून ‘शार्क टँक इंडिया’मध्ये दिलं ऑडिशन पण..

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेता दिवाळखोरीत; शेतीची वाट धरून ‘शार्क टँक इंडिया’मध्ये दिलं ऑडिशन पण..

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या गाजलेल्या मालिकेतील रोसेश साराभाईला तुम्ही ‘शार्क टँक इंडिया’च्या शोमध्ये कल्पना करू शकता का? पण असं चित्र खरंच पाहायला मिळालं असतं जर मालिकेत रोसेशची भूमिका साकारणारा अभिनेता राजेश कुमारला ‘शार्क टँक इंडिया’ या लोकप्रिय शोच्या परीक्षकांनी निवडलं असतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजेशने खुलासा केला की, त्याने ‘शार्क टँक इंडिया’साठी अर्ज केला होता. इतकंच नव्हे तर त्याने या शोमध्ये दोन राऊंड्ससुद्धा पार केले होते. अभिनय क्षेत्र सोडून शेतीकडे वळल्यानंतर राजेशने ‘शार्क टँक इंडिया’मध्ये जाऊन आपल्या व्यवसायासाठी गुंतवणूक मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजेश त्याच्या करिअरमधील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “मी शार्क टँक इंडियामध्ये अर्ज केला होता. तीन राऊंड्सपैकी मी दोन राऊंड्स क्लिअरसुद्धा केले होते. तुम्हाला तुमचे काही व्हिडीओ पाठवावे लागतात. माझा चेहरा इंडस्ट्रीत परिचित असल्याने मला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. अभिनेता शेतीविषयी बोलतोय, या अँगलचा विचार करून ते संधी देतील, असं मला वाटलं होतं. कोलकातामध्ये माझं प्रेझेंटेशन होतं आणि एका दिवसात ते संपलं होतं. माझ्या वडिलांनी तिकिटाचे पैसे भरले होते”, असं त्याने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by DD National (@ddnational)

“शार्क टँक इंडियाच्या ऑडिशनमधून बाहेर पडण्याआधी मला नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ‘हड्डी’ या चित्रपटासाठी फोन आला होता. त्यांना मला भेटायचं होतं. पण त्यावेळी माझ्यात आत्मविश्वासच उरला नव्हता. ऑडिशनशिवाय एखादी भूमिका मिळेल असं वाटलंच नव्हतं. त्यामुळे जेव्हा मी कास्टिंग डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये गेलो, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की दिग्दर्शकांना मला भेटायचं आहे. ते माझं ऑडिशन घेतील असं वाटलं होतं. निर्मिती संस्थेतील व्यक्ती मानधनाविषयी तुमच्यासोबत चर्चा करेल, असं त्यांनी सांगितलं. पण तेसुद्धा ऑडिशननंतर होईल, असं वाटलं होतं. पण सुदैवाने ऑडिशनशिवाय मला ती भूमिका मिळाली होती. ”

टीव्ही इंडस्ट्री आणि अभिनयविश्वातील कामाला कंटाळून शेतीकडे वळल्याचं राजेशने एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र शेतात काम करताना राजेशने काही वर्षांतच जमा केलेली बरीच रक्कम गमावली. या निर्णयामुळे दिवाळखोरीत आल्याचा खुलासा त्याने केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती त्यामूळे…,’ काय म्हणाले संजय शिरसाट ‘दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती त्यामूळे…,’ काय म्हणाले संजय शिरसाट
आनंद दिघे यांच्या जीवनावरील धर्मवीर – 2 हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित केले...
तो येतोय… कुणाचे बॅनर्स?, अचानक शेकडो बॅनर्स लागल्याने नवी मुंबईत चर्चांना उधाण
बेपत्ता एमसी स्टॅन?, थेट विविध शहरात लावण्यात आले पोस्टर्स, मुंबईमधून बेपत्ता झाला आणि…
IIFA Awards 2024 मध्ये जान्हवी कपूरने गळ्यात घातलेल्या नेकलेसची किंमत वाचून विस्फारतील डोळे
लग्नाच्या 10 महिन्यांतच घटस्फोट; सध्या काय करते करण सिंह ग्रोवरची पूर्व पत्नी?
शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर अकोल्यात हल्ला, तिघांना अटक
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार तर एक जवान शहीद