व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना ठाणे पोलिसांकडून अटक

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना ठाणे पोलिसांकडून अटक

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांवर एंबरग्रीस तस्करीच्या गुन्ह्याखाली ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या उलटीची किंमत कोट्यावधींमध्ये असल्याचे समजते. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठाणे पोलीस कार्यालयाकडून सांगण्यात आले की, 27 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरक्षक दत्ताराम भोसले यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की, काही लोक दुपारी दोनच्या सुमारास वॅगनार कारमधून डोंबिवली परिसरात व्हेलच्या उलटी विकण्यासाठी येणार आहेत. यानंतर ठाणे पोलिसांनी घटनास्थळ गाठून वॅगनार कारमधून बॅगेत ठेवलेला अंबरग्रीस जप्त केला. यासोबतच तिघांना अटक देखील करण्यात आली. यामध्ये अनिल भोसले (55), अंकुश शंकर माळी  (45) आणि  लक्ष्मण शंकर पाटील (63) अशी आरोपींची नावे आहेत.

परफ्यूम उत्पादक कंपन्यांमध्ये याला मोठी मागणी आहे. याचा उपयोग परफ्यूमला दीर्घकाळ सुरक्षित आणि सुगंधित ठेवण्यासाठी केला जातो. त्यामुळे कंपन्या त्यासाठी जास्त किंमत मोजायला तयार आहेत. याशिवाय व्हेलच्या उलटीचा उपयोग औषधे बनवण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर महागडी दारू आणि सिगारेट बनवण्यातही त्याचा उपयोग होतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्रीच…शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्रीच…शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्याचवेळी महायुतीमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा...
महायुती सरकार महाराष्ट्राचा 7/12 अदानीच्या नावे लिहिणार का? विजय वडेट्टीवार यांचा संताप, सरकारवर घणाघात
नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार, 112 ठार; कोसीची पाणीपातळी वाढल्याने बिहारही जलमय, 56 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी लावलेले आयईडी डिफ्युज करताना स्फोट , CRPF चे पाच जवान जखमी
महाराष्ट्र विक्री आहे! जमीन, उद्योगानंतर आता शाळाही अदानीच्या ताब्यात; अंबादास दानवेंचा मिंधे सरकारवर हल्लाबोल
‘हेलेन’चा अमेरिकेत तर मॅक्सिकोमध्ये ‘जॉन’ चक्रीवादळाचा धुमाकूळ, 50 हून अधिक लोकांचा मृत्यू
लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांना पगारही नाही मिळणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ