Ind Vs Ban 2nd Test – कानपूर कसोटीला पावसामुळे ब्रेक, बांगलादेशने बनवल्या 107 धावा

Ind Vs Ban 2nd Test – कानपूर कसोटीला पावसामुळे ब्रेक, बांगलादेशने बनवल्या 107 धावा

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये आज दुसऱ्या कसोटी सामन्याला कानपुरमध्ये सुरुवात झाली. मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ फक्त 35 षटकांमध्ये संपूष्टात आला. पहिल्या दिवसाअखेर बांगलादेशने तीन विकेट गमावत 107 धावा केल्या आहेत.

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतीत दुसऱ्या सामन्याला शुक्रवार (27 सप्टेंबर) पासून सुरुवात झाली. कानपुरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाची बॅटींग पहायला मिळाली. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत, बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र बांगलादेशची सुरुवात खराब झाली. त्यांना पहिला हादरा 26 या धावसंख्येवर झाकिर हसनच्या स्वरुपात बसला. त्यानंतर आकाश दीपने शादमान इस्लामला LBW करत 29 या धावसंख्येवर बांगलादेशची दुसरी विकेट घेतली. त्याचबरोबर अश्विनने बांगलादेशच्या कर्णधाराला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि बांगलादेशला तीसरा धक्का नझमुल हुसैन शांतोच्या स्वरुपात बसला.

पाऊस आणि खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ फक्त 35 षटकांचा होऊ शकला. दिवसा अखेर बांगलादेशने 3 विकेट गमावत 107 धावा केल्या आहेत. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चेन्नई येथे झालेला पहिला कसोटी सामना जिंकला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत OBC प्रवर्गातून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ यांचा विजय झाला. सर्वात आधी मयूर पांचाळ...
सैफ अली खान याने केले राहुल गांधीबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाला, देशाला…
ऐश्वर्या राय हिच्यावर प्रश्नांचा भडीमार, लोक संतापले, म्हणाले, कधीतरी…
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या, शशिकांत झोरे यांची हॅट्ट्रिक
जमीन घोटाळाप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात FIR दाखल
पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री करतात; केजरीवालांची मोदींवर घणाघाती टीका
विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र