‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मध्ये मोठा ट्विस्ट; सात वर्षांनंतरच्या कथानकात काय होणार बदल?
'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट येणार आहे. शतग्रीवच्या वार करण्याने इंद्राणी कोमात जाते आणि शतग्रीव रीमाऐवजी ईशाला म्हणजेच जे दैवी बाळ आहे त्याला घेऊन जातो.
त्याच्या तावडीतून नेत्रा ईशाला देवीआईच्या मदतीने सोडवते. शतग्रीवला मैथिलीचं शरीर सोडावं लागलं आणि नेत्राला तिची मुलगी ईशा परत मिळाली. त्याचवेळी त्रिनयना देवीने मैथिलीला आधार देण्यासाठी नेत्राला आदेश दिला. देवीने सांगितल्याप्रमाणे नेत्रा मैथिलीला पुन्हा घरात घेऊन येते.
राजाध्यक्ष कुटुंब काही केल्या मैथिलीला स्वीकारण्यात कोणतंच स्वारस्य दाखवत नाहीत हे समजून नेत्राने त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच मैथिलीला आपलंस करणार नाही हे लक्षात येतं. नेत्राची खटपट पाहून शेवटी मैथिली नेत्राचा विचार करून घर सोडते.
तेव्हाच पुरलेल्या बंटीमामाच्या कानात शतग्रीव प्रवेश करत मैथिलीची भेट घेतो. मैथिली मात्र तिथपासून दूर पळते आणि राजाध्यक्ष कुटुंबात परतते. त्यावेळी एक आकाशवाणी होते की शतग्रीव पुन्हा येणार. ही सृष्टी उद्ध्वस्त करणार आणि मालिकेचं कथानक सात वर्षे पुढे जातं.
सात वर्षांनंतर ईशा-रीमा मोठ्या झाल्या आहेत. पण राजाध्यक्ष कुटुंबात नेत्राला वाटणारं सुख हे खरंतर वरवरचा देखावा असून घर दुभंगलं जातं. नेत्रा मैथिलीचं सगळं करण्यात आणि मुलींच्या संगोपनात गर्क होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List