अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्याने काढून टाकली लग्नाची अंगठी
अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांच्यात काही आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. अशातच अंबानींच्या लग्नालाही दोघं वेगवेगळे होते. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी जोर मिळाला.
हल्ली अभिषेक फक्त त्याच्या कुटुंबीयांसोबत दिसून येतो. तर ऐश्वर्या ही तिची मुलगी आराध्यासोबतच दिसून येते. नुकतीच ती आराध्यासोबत दुबईला एका पुरस्कार सोहळ्यात गेली होती. तिथले विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यातील ऐश्वर्याच्या एका गोष्टीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे तिच्या हातात साखरपुड्याची अंगठीच दिसून आली नाही. ऐश्वर्याच्या हातात नेहमीच तिच्या साखरपुड्याची अंगठी पहायला मिळायची. मात्र यावेळी ती न दिसल्याने पुन्हा एकदा घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
ऐश्वर्या ही आराध्यासोबत SIIMA पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. दुबईत ऐश्वर्याच्या चाहत्यांनी तिचं जोरदार स्वागत केलं होतं. आईला पुरस्कार मिळाल्यानंतर आराध्यानेही तिचे फोटो क्लिक केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List