भूसंपादन प्रक्रियेत जमीनमालकाला भरपाई देणे सरकारचे कर्तव्यच; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

भूसंपादन प्रक्रियेत जमीनमालकाला भरपाई देणे सरकारचे कर्तव्यच; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

सार्वजनिक प्रकल्पांमध्ये स्वतःची खाजगी जमीन गमावणाऱ्या जमीन मालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भूसंपादन प्रक्रियेत जमीनमालकाला भरपाई देणे सरकारी यंत्रणांचे कर्तव्यच आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. टीडीआरच्या रूपात भरपाई निश्चित केल्यानंतर जमीनमालकाने निवेदन दिले नाही तरी भरपाई देण्यासाठी सरकार बांधील असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

बृहन्मुंबई महापालिकेने रस्ते तसेच इतर सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन संपादित केली होती. त्या जमिनीच्या बदल्यात भरपाई म्हणून टीडीआरची मागणी करीत बिल्डरांनी मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका केल्या होत्या. तथापि, टीडीआरची मागणी करण्यास 8 ते 13 वर्षांचा विलंब केल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने 2018 मध्ये बिल्डरांच्या याचिका फेटाळल्या होत्या.

मुंबई उच्च न्यायालयाचा सहा वर्षांपूर्वीचा तो निकाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन. के. सिंह यांच्या खंडपीठाने रद्द केला. टीडीआरची मागणी करण्यास विलंब केल्याच्या कारणावरून रिट याचिका फेटाळण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कुकरेजा कन्स्ट्रक्शन व इतरांनी दाखल केलेल्या जवळपास अर्धा डझन अपिलांचा स्वीकार केला आणि बृहन्मुंबई महापालिकेला टीडीआरच्या रूपात भरपाई देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

सार्वजनिक प्रकल्पांत जमीन गमावलेल्या जमीनमालकांना भरपाई देणे हे राज्य सरकारचे कर्तव्यच आहे. सरकार जर भरपाई देण्याचे हे कर्तव्य योग्यरीत्या बजावत नसेल, तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 300 मधील तरतुदीचे उल्लंघन ठरेल, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

योजनांचा पाऊस, वित्तविभागाला घाम?, वाचा ‘टीव्ही 9 मराठी’चा स्पेशल रिपोर्ट! योजनांचा पाऊस, वित्तविभागाला घाम?, वाचा ‘टीव्ही 9 मराठी’चा स्पेशल रिपोर्ट!
‘दैनिक इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीनुसार, वित्त विभागानं सरकारच्या तिजोरीबद्दलच चिंता व्यक्त करत सरकारी योजनांवर बोट ठेवलं आहे. राज्यात संकुलं बांधकामासाठी क्रीडा...
भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल
लोकांची हसती-खेळती घरं उद्ध्वस्त केली; भाजपच्या ‘बुलडोझर राजवर’ अखिलेश यादव यांचा हल्लाबोल
हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला, शरीरावर घाव नाही
Photo – सईचा हॉट लूक सोशल मीडियावर चर्चेत, फोटोंवर चाहते फिदा
दिवाळीपूर्वी BCCI चे खेळाडूंना गिफ्ट; बंगळुरूमध्ये National Cricket Acadamy चे उद्घाटन, नावातही केला बदलं
Ratnagiri News – वर्दळीच्या हर्णे मार्गावर खड्डयांचे साम्राज्य; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष