दोन दिवसात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

दोन दिवसात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

देशात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र आता दोनच दिवसात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्था व फेडरल रिझर्व्ह बँकेने कमी केलेले व्याजदर यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. तसेच या दोन दिवसात चांदीच्या दरातही विक्रमी वाढ झाली आहे. दोन दिवसात चांदीच्या भावात 7 हजारांची प्रति किलो वाढ झाली आहे. तर सोन्याच्या भावात 2 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम अशी वाढ झाली आहे.

या दरवाढीमुळे चांदी 91000 रूपये प्रति किलो तर सोने 75200 रूपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. 1991 नंतर म्हणजे सुमारे 34 वर्षांनी कमी कालावधीत म्हणजे दोन दिवसात सोन्याचांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. ही दरवाढ दिवाळीपर्यंत स्थिरावण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शेअर बाजारातील अस्थिरता आणि जागतिक अर्थव्यवस्थेमुळे सोन्याचांदीच्या दरात बदल होत आहेत.

13 सप्टेंबर रोजी चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. एकाच दिवसात चांदीच्या दरात तब्बल 4400 रुपयांची वाढ झाली. तर सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांची जबरदस्त परतावा मिळत आहे. मात्र, लग्नसराई जवळ येत असल्याने सर्वसामान्यांना सोनेखरेदी महागात पडत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल
जनता ही वाघनखं आहेत आणि ही वाघनखं तुमच्या राजकारणाचा कोथळा बाहेर काढणार असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव...
लोकांची हसती-खेळती घरं उद्ध्वस्त केली; भाजपच्या ‘बुलडोझर राजवर’ अखिलेश यादव यांचा हल्लाबोल
हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला, शरीरावर घाव नाही
Photo – सईचा हॉट लूक सोशल मीडियावर चर्चेत, फोटोंवर चाहते फिदा
दिवाळीपूर्वी BCCI चे खेळाडूंना गिफ्ट; बंगळुरूमध्ये National Cricket Acadamy चे उद्घाटन, नावातही केला बदलं
Ratnagiri News – वर्दळीच्या हर्णे मार्गावर खड्डयांचे साम्राज्य; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
ना मणिरत्नम, ना अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रायने या सुपरस्टारचे पाय धरले, व्हिडियो पाहून युजर म्हणाले…