बार्टीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी आंदोलन, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

बार्टीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी आंदोलन, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

बार्टीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आंदोलन सुरू केले आह. पण आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग का येत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी विचारला आहे. तसेच पीएचडी करून काय दिवे लावणार असे प्रश्न विचारणारे या प्रश्नाकडे लक्ष देतील असे अजित पवारांचे नाव न घेता टोलाही लगावला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, गेल्या आठवड्याभरापासून सारथीचे विद्यार्थी आंदोलन करत असतानाही सरकार मुद्दामहून त्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा करत आहे. 100 टक्के अधिछात्रवृत्ती मिळावी या मागणीसाठी बार्टीच्या विद्यार्थांनी देखील आंदोलन केले, तेव्हा सरकारने निर्णय घेतला. आता याच मागणीसाठी सारथीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागत आहे, उद्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागेल. आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग का येत नाही ? असो, पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत का? असा प्रश्न विचारणारे सत्ताधारी विद्यार्थ्यांच्या सबंधित प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल
जनता ही वाघनखं आहेत आणि ही वाघनखं तुमच्या राजकारणाचा कोथळा बाहेर काढणार असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव...
लोकांची हसती-खेळती घरं उद्ध्वस्त केली; भाजपच्या ‘बुलडोझर राजवर’ अखिलेश यादव यांचा हल्लाबोल
हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला, शरीरावर घाव नाही
Photo – सईचा हॉट लूक सोशल मीडियावर चर्चेत, फोटोंवर चाहते फिदा
दिवाळीपूर्वी BCCI चे खेळाडूंना गिफ्ट; बंगळुरूमध्ये National Cricket Acadamy चे उद्घाटन, नावातही केला बदलं
Ratnagiri News – वर्दळीच्या हर्णे मार्गावर खड्डयांचे साम्राज्य; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
ना मणिरत्नम, ना अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रायने या सुपरस्टारचे पाय धरले, व्हिडियो पाहून युजर म्हणाले…