आता जनतेच्या न्यायालयात जाणार, दोन दिवसात राजीनामा देणार; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

आता जनतेच्या न्यायालयात जाणार, दोन दिवसात राजीनामा देणार; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला असून ते बाहेर आले आहेत. त्यांनी रविवारी आपच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. आता आपण जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत. आपण दोन दिवसात राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा केजरीवाल यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अटीशर्थींसह जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. केजरीवाल यांनी रविवारी पक्ष कार्यालयात भेट दिली. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. आता आपण दोन दिवसात राजीनामा देणार आहेत. तसेच आता जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत. महाराष्ट्रासह दिल्लीतही निवडणूका घेण्यात याव्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कजेरीवाल इमानदार आहे, असा निर्णय जनता देत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसणार नाही, असेही केजरीवाल यांनी जाहीर केले. मी प्रामाणिक आहे आणि इमानदारीने काम केले आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर माझ्याबाजूने कौल द्या, असे आवाहनही त्यांनी केले. आता मी तुमच्यामध्ये आलो आहे. मी जनतेच्या दरबारात आलो आहे. मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही केजरीवाल यांना इमानदार मानता की गुन्हेगार…हा प्रश्न आपण जनतेला विचारणार आहोत. जनतेने केजरीवाल इमानदार आहे, असा कौल दिल्यानंतरच आपण मुख्यमंत्रईपदाच्या खुर्चीत बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व गैर-भाजप मुख्यमंत्र्यांना आपले आवाहन आहे की, भाजपने तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केला तर घाबरू नका. तुरुंगातूनही सरकार चालवता येते. आम्ही हे दाखवून दिले आहे. भाजपच्या सर्व कारस्थानांचा मुकाबला करण्याची ताकद आम आदमी पक्षाकडे आहे. आपण प्रामाणिक आहोत. ते आमच्या प्रामाणिकपणाला घाबरतात. त्यामुळे त्यांनी माझ्यावर पीएमएलए या देशातील सर्वात कठोर कायद्यानुसार आरोप लावले. मात्र, आपल्याला न्यायालायकडून जामीन मिळाला, असेही केजरीवाल म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती त्यामूळे…,’ काय म्हणाले संजय शिरसाट ‘दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती त्यामूळे…,’ काय म्हणाले संजय शिरसाट
आनंद दिघे यांच्या जीवनावरील धर्मवीर – 2 हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित केले...
तो येतोय… कुणाचे बॅनर्स?, अचानक शेकडो बॅनर्स लागल्याने नवी मुंबईत चर्चांना उधाण
बेपत्ता एमसी स्टॅन?, थेट विविध शहरात लावण्यात आले पोस्टर्स, मुंबईमधून बेपत्ता झाला आणि…
IIFA Awards 2024 मध्ये जान्हवी कपूरने गळ्यात घातलेल्या नेकलेसची किंमत वाचून विस्फारतील डोळे
लग्नाच्या 10 महिन्यांतच घटस्फोट; सध्या काय करते करण सिंह ग्रोवरची पूर्व पत्नी?
शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर अकोल्यात हल्ला, तिघांना अटक
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार तर एक जवान शहीद