गणपती विसर्जन करताना दोघे समुद्रात बुडाले, पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले

गणपती विसर्जन करताना दोघे समुद्रात बुडाले, पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले

सात दिवसांच्या गणपती बाप्पांचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. लाडक्या बापाला सर्वत्र भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती विसर्जनादरम्यान खार येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. बाप्पाचे विसर्जन करताना दोघे समुद्रात बुडाले. मात्र पोलिसांच्या वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्यांनी दोघांचेही प्राण वाचवले. दोन्ही तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खार पश्चिमेकडील कार्टर रोड येथे दोन तरुण गणपती विसर्जनासाठी समुद्रात गेले होते. मात्र गणपती विसर्जनासाठी गेलेले तरुण समुद्रात बुडू लागले. समुद्रावर गस्तीवर असलेले सहायक फौजदार राजू गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास बाबर, पोलीस शिपाई रमेश वळवी आणि पोलीस शिपाई मोकाशी यांना तरुण बुडत असल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच या पोलीस पथकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून समुद्रात उडी घेतली आणि तरुणांना वाचवले. बेशुद्ध तरुणांना सीपीआर दिल्यानंतर शुद्ध आली. त्यानंतर उपचारासाठी त्यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड, लाडकी बहीण चिडल्याची विरोधकांची टीका फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड, लाडकी बहीण चिडल्याची विरोधकांची टीका
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्या या महिलेचं नाव धनश्री सहस्रबुद्धे आहे. महिलेचं मानसिक संतुलन बिघडलेले असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दादरमध्ये राहणाऱ्या...
बिग बॉसच्या 18वा सीझनमध्ये सलमान खानसोबत दिसणार हा कॉमेडियन
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल, विविध मागण्यांसठी उमेद संघटनेचा रत्नागिरीत मोर्चा
मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची कानउघाडणी
तो सीन आणि ते नावही वगळा; कंगनाच्या ‘एमर्जन्सी’तील 13 सीनला सेन्सॉर बोर्डाची ‘एमर्जन्सी’ कात्री
सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा संताप, भाजप-मिंधे सरकारवर ताशेरे
उज्जैनमध्ये महाकाल मंदिराजवळ भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती