चंद्रचूड हे खूर्चीवर असेपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही! संजय राऊत यांचं रोखठोक मत

चंद्रचूड हे खूर्चीवर असेपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही! संजय राऊत यांचं रोखठोक मत

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरती केली. यानंतर सरन्यायाधीशांच्या या कृतीविरोधात ज्येष्ठ वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हा संदर्भातील खटला, आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुरू असताना पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीशांची खासगी भेट यामुळे न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. यांसदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली आहे.

सोलापूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘चंद्रचूड हे जोपर्यंत या खूर्चीवर आहेत तोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही’, असं रोखठोक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

‘चंद्रचूड हे देशाचे सरन्यायाधीश आहेत. या देशाच्या घटनेचे रखवालदार आहेत, देशाच्या संविधानाचे चौकीदार आहेत. या राज्यातील घटनाबाह्य सरकार हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या प्रेरणेनं आलेलं आहे. हे संविधान विरोधी सरकार आहे. पण ज्या पद्धतीने काल चंद्रचूड आणि प्रधानमंत्र्यांनी आरती केली, त्या आरतीतून सत्य स्पष्ट आहे की या देशातल्या घटनाबाह्य गोष्टींना न्यायालय संरक्षण देत आहे आणि देशासाठी ही धोक्याची घंटा आहे’, अशा अत्यंत स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली.

दरम्यान, पत्रकार परिषदेला संबोधित करताना संजय राऊत यांनी राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना ‘कोणतीही जागा महायुतीसाठी अजिक्य नाही, प्रत्येक जागेवर महायुतीला आव्हान आहे. मुंबईचं वातावरण सुद्धा महाविकास आघाडीसाठीच अनुकूल आहे. जे चित्र लोकसभेत होतं तेच चित्र मुंबईच्या बाबतीत विधानसभेत किंबहूना जास्त जागा आम्ही जिंकू’, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

भाजपचा सर्व्हे चुकीचा आहे. देवेंद्र फडणवीसांना आताच दम लागतो आहे. 12 ते 13 जागाच भाजपला मिळतील. संपूर्ण विदर्भात महाविकास आघाडीलाच अधिक जागा मिळतील. त्यासाठी आम्ही मेहनत करत आहोत. असं संजय राऊत म्हणाले.

भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही…

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आज आंदोलन करत आहे त्यावर बोलताना संजय राऊत यांनी टोला लगावला. ‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आरक्षणासंदर्भातील वक्तव्य भाजपने नेहमीप्रमाणे मोडून तोडून समोर आणलेलं आहे. आरक्षण रद्द करू असं कोणतंही वक्तव्य राहुल गांधींनी केलेलं नाही. भारतीय जनता पक्षाला पूर्ण ऐकण्याची सवय नाही. त्यांना हवं आहे तितकंच ते ऐकतात आणि बाकीचं तोडून मोडून फेकून देतात. काँग्रेस पक्षाची भूमिका मला माहित आहे. किंबहूना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आरक्षणाविषयची भूमिका काय हेही मला माहित आहे. जोपर्यंत समाजामध्ये विषमता आहे, समान न्यायाचे तत्त्व लागू होत नाही, दूर्बल समाजाल न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण राहील अशा प्रकारची भूमिका आमच्या सगळ्यांची आहे’, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत OBC प्रवर्गातून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ यांचा विजय झाला. सर्वात आधी मयूर पांचाळ...
सैफ अली खान याने केले राहुल गांधीबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाला, देशाला…
ऐश्वर्या राय हिच्यावर प्रश्नांचा भडीमार, लोक संतापले, म्हणाले, कधीतरी…
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या, शशिकांत झोरे यांची हॅट्ट्रिक
जमीन घोटाळाप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात FIR दाखल
पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री करतात; केजरीवालांची मोदींवर घणाघाती टीका
विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र