आली मान्सूनच्या निरोपाची वेळ, हवामान विभागाने दिली परतण्याची तारीख, यंदा देशभरात धो-धो बससला

आली मान्सूनच्या निरोपाची वेळ, हवामान विभागाने दिली परतण्याची तारीख, यंदा देशभरात धो-धो बससला

monsoon return: नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सून यंदा चांगलाच बरसला. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे यंदा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांना फायदा होणार आहे. राज्यातील धरणांमध्ये चांगला जलसाठा निर्माण झाल्यामुळे केवळ पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपला नाही तर यंदा शेतीलाही मुबलक पाणी मिळणार आहे. आता मान्सून आपला परतीचा प्रवास सुरु करणार आहे. त्यासंदर्भातील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सून १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत परतीचा प्रवास सुरु करण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने सांगितले आहे.

यंदा वेळेपूर्वी मान्सून आला

मान्सून यंदा सरासरीपेक्षा जास्त असणार असल्याचा अंदाज मे महिन्यातच हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानंतर अंदमान निकोबार बेटांवर वेळेपूर्वी मान्सून दाखल झाला आहे. केरळमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झाला. सर्वसाधारणपणे मान्सून १ जूनला केरळमध्ये पोहोचतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पसरतो. त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास १७ सप्टेंबरच्या आसपास सुरू होतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून माघारी फिरतो.

सप्टेंबर महिन्यात पाऊस पडणार की नाही?

हवामान विभागाने सांगितले की, वायव्य भारताच्या काही भागांमधून नैऋत्य मोसमी वारे परत फिरण्यासाठी पुढील आठवड्यात अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. यामुळे १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. सध्या सक्रिय असलेल्या ला-निनाच्या प्रभावामुळे सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली गेली. हा पाऊस ऑक्टोंबरमध्येही लांबणार असल्याचे भाकीत व्यक्त केले होते. परंतु हवामान विभागाने ही शक्यता फेटाळली आहे.

देशात ८३६.७ मिमी पर्जन्यमान

देशात सरासरी पर्जन्यमान ७७२.५ मिमी असते. परंतु १ जूनला मान्सून देशात दाखल झाल्यापासून आतापर्यंत ८३६.७ मिमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण आठ टक्के जास्त आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा १६ टक्के कमी पाऊस पडला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत OBC प्रवर्गातून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ यांचा विजय झाला. सर्वात आधी मयूर पांचाळ...
सैफ अली खान याने केले राहुल गांधीबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाला, देशाला…
ऐश्वर्या राय हिच्यावर प्रश्नांचा भडीमार, लोक संतापले, म्हणाले, कधीतरी…
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या, शशिकांत झोरे यांची हॅट्ट्रिक
जमीन घोटाळाप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात FIR दाखल
पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री करतात; केजरीवालांची मोदींवर घणाघाती टीका
विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र