असलं रडकं सरकार बघितलं नाही : मनोज जरांगे पाटील

असलं रडकं सरकार बघितलं नाही : मनोज जरांगे पाटील

असलं रडकं सरकार कधीच बघितलं नाही. फडणवीस खूप हुशार, चाणक्य आहेत असे वाटायचे. मात्र ते फक्त याला फोडा त्याला फोडा, त्याच्यावर केस करण्यात आणि फोडाफोडीत हुशार आहेत. त्यामुळे भाजपाचेच लोक त्यांचा कार्यक्रम लावणार आहेत. म्हणून मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. समाज तुमचा फायदा करेल. पण नाही दिले तर निवडणुकीत खेळ खल्लास, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

जरांगे म्हणाले की, तुम्हाला जर राज्यातील ५० ते ५५ टक्के मराठा विरोधात जाऊ द्यायचा नसेल तर ओबीसीतून आरक्षण द्या. मराठे दादागिरीला मोजत नाहीत, सगळ्यांची दादागिरी मोडीत काढणार आहेत. महाविकास आघाडी सत्तेत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कुठून आरक्षण मागणार? त्यांना काय प्रश्न विचारणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकांची आशा तुमच्याकडून आहे. तुम्ही आरक्षण द्या, तुम्हाला फायदा होईल. लोकसभा निवडणुकीत त्यांना फायदा झाला कारण तुम्ही आरक्षण दिले नाही, असे ते म्हणाले.

प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, थोड्या दिवसात ते बी येडं होतं की काय? माझे एकच म्हणणे आहे, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या, मराठे तुम्हाला डोक्यावर घेतील, तुम्ही नाही दिले की निवडणुकीत खेळ खल्लास करतील, असा इशारा त्यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Saamana News Express: ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या; फक्त स्क्रोल आणि रहा अपडेट Saamana News Express: ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या; फक्त स्क्रोल आणि रहा अपडेट
राज्य उलथण्याच्या भीतीने मिंध्यांची टरकली; छत्रपती संभाजीनगरात आणीबाणी!
हवामान खात्याच्या रेड अलर्टला हुलकावणी, दिवसभर पावसाची नुसती हुलाहूल
सिनेटचा आज निकाल, मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
चिखलामुळे ‘कमळा’ची माघार, मोदींच्या सभेसाठीचा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात!
ओशिवऱ्यातील एका घरासाठी 765 अर्ज, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या घरांना जोरदार मागणी
संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद कायम सदस्यत्वासाठी फ्रान्सचा हिंदुस्थानला पाठिंबा