शीर गायब, कानपूर महामार्गावर महिलेचा निर्वस्त्र मृतदेह; बलात्कारानंतर हत्या?

शीर गायब, कानपूर महामार्गावर महिलेचा निर्वस्त्र मृतदेह; बलात्कारानंतर हत्या?

कानपूर महामार्गावर शीर नसलेला महिलेचा निर्वस्त्र मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दिल्ली-वाराणसी राष्ट्रीय महामार्गावर 40 वर्षीय शीर नसलेला अर्धनग्न मृतदेह आढळून आला. दरम्यान, डीसीपी रवींद्र कुमार यांनी पीडितेचा अपघातात मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महिलेचे दात आणि हाडांचे तुकडे ताब्यात घेतले. फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल.

मृतदेह आढळून आला तेथे सीसीटीव्ही कॅमेरा नाही. मात्र पोलिसांनी आसपासच्या परिसरातील 104 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. यापैकी तीन व्हिडिओमध्ये एक महिला एकटी सर्विस लेन आणि महामार्गावर चालताना कैद झाली आहे. ज्या महिलेचा मृतदेह सापडला ती सीसीटीव्हीत दिसणारी महिलाच आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

सपा प्रमुख अखिलेश यांची प्रतिक्रिया

दरम्यान सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणी निःष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे. कानपूर महामार्गावर महिलेचा शीर नसलेला विवस्त्र मृतदेह आढळणे ही उत्तर प्रदेशातील महिलांवरील अत्याचाराची आणखी एक हृदयद्रावक घटना आहे. महिलेचा छळ आणि बलात्कारानंतर हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या दिशेने नि:पक्षपातीपणे तपास व्हायला हवा. दोषींचा शोध घेऊन पीडितेला न्याय मिळवून द्यावा. महिलांवरील अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गुन्हे करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण केली पाहिजे. भाजप सरकार राजकारण बाजूला ठेवून याची चौकशी करेल अशी आशा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओशिवऱ्यातील एका घरासाठी 765 अर्ज, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या घरांना जोरदार मागणी ओशिवऱ्यातील एका घरासाठी 765 अर्ज, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या घरांना जोरदार मागणी
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला मिळालेल्या 370 घरांना जोरदार मागणी असल्याचे दिसतेय. 33(5) अंतर्गत या योजनेतील ओशिवरा...
संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद कायम सदस्यत्वासाठी फ्रान्सचा हिंदुस्थानला पाठिंबा
मिंधे सरकारचे थोबाड फुटले… भ्रष्टाचाराच्या मतलबी वाऱ्यामुळे कोसळला राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा!
कर्नाटकात सीबीआयला नो एण्ट्री
आरोप सार्वजनिक हितासाठीच, पण तक्रारदाराला मानसिक वेदना झाल्यात म्हणून मानहानी प्रकरणात न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवले
असा बिनकामाचा मुख्यमंत्री देशाने कधी पाहिला नसेल, मुंबईकरांच्या पाऊसकोंडीवरून आदित्य ठाकरे मिंध्यांवर बरसले
Maharashtra Assembly Election : विधानसभेची लगबग सुरू, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत