भाजप शासित राज्यांत कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात नाही! मध्य प्रदेशातील अत्याचाराच्या घटनेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

भाजप शासित राज्यांत कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात नाही! मध्य प्रदेशातील अत्याचाराच्या घटनेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील जामगेटजवळ मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. दोन तरुण लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मैत्रिणींवर सशस्त्र हल्लेखोरांनी निर्घृण हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी आता लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘X’ अकाउंटवर या प्रकरणी एक पोस्ट शेअर केली आहे. मध्य प्रदेशातील ही घटना अत्यंत वाईट आणि लाजिरवाणी आहे. मध्य प्रदेशात दोन लष्करी जवानांवरील हल्ला आणि त्यांच्या महिला साथीदारावर झालेला सामूहिक बलात्कार संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद आहे. भाजप शासित राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वातच नाही. येथे दररोज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत भाजप सरकारचा नकारात्मक दृष्टीकोन फारच चिंताजनक असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

‘सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे देशातील महिलावर्ग असुरक्षित आहे. यामुळे हिंदुस्थानातील मुलींच्या स्वातंत्र्यावर, त्यांच्या इच्छा आकांक्षावंर मर्यादा घालल्या जात आहेत. सरकारला आणि समाजाला देखील याची लाज वाटली पाहिजे. महिलांच्या सुरक्षेबाबत गांभिर्याने विचार केला गेला पाहिजे. देशाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या रक्षणाच्या जबाबदारीकडे तुम्ही किती वेळ डोळेझाक करणार आहात? असा परखड सवाल यावेळी राहुल गांधी यांनी सरकारला केला.

Madhya Pradesh भयंकर घटना! प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकाऱ्यांना लुटले; मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओशिवऱ्यातील एका घरासाठी 765 अर्ज, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या घरांना जोरदार मागणी ओशिवऱ्यातील एका घरासाठी 765 अर्ज, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या घरांना जोरदार मागणी
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला मिळालेल्या 370 घरांना जोरदार मागणी असल्याचे दिसतेय. 33(5) अंतर्गत या योजनेतील ओशिवरा...
संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद कायम सदस्यत्वासाठी फ्रान्सचा हिंदुस्थानला पाठिंबा
मिंधे सरकारचे थोबाड फुटले… भ्रष्टाचाराच्या मतलबी वाऱ्यामुळे कोसळला राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा!
कर्नाटकात सीबीआयला नो एण्ट्री
आरोप सार्वजनिक हितासाठीच, पण तक्रारदाराला मानसिक वेदना झाल्यात म्हणून मानहानी प्रकरणात न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवले
असा बिनकामाचा मुख्यमंत्री देशाने कधी पाहिला नसेल, मुंबईकरांच्या पाऊसकोंडीवरून आदित्य ठाकरे मिंध्यांवर बरसले
Maharashtra Assembly Election : विधानसभेची लगबग सुरू, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत