मुसळधार पावसामुळं राजगड किल्ल्याची 400 वर्ष जुनी भिंत कोसळली, 2 लहान मुलांसह 7 जणांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळं राजगड किल्ल्याची 400 वर्ष जुनी भिंत कोसळली, 2 लहान मुलांसह 7 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यामध्ये पावसाचा अक्षरश: कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच राजगड किल्ल्याची भिंत कोसळल्याचे समोर आले आहे. सकाळी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली असून भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दतिया जिल्ह्यातील खलकापुरा भागामध्ये राजगड किल्ला असून किल्ल्याच्या जवळच घरं आहेत. मुसळधार पावसामुळे जर्जर झालेली भिंत पहाटेच्या सुमारास घरावर कोसळली. यावेळी घरातील सदस्य गाड झोपेमध्ये होते. ते सर्वच भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ढिगारा हटवून दोघांना बाहेर काढले. मात्र इतरांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यास उशिर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह जिल्हाधिकारी, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगारा हटवण्यात आला असून जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.

4 लाखांची मदत जाहीर

जिल्हाधिकाऱ्यांनी सदर घटनेची माहिती राज्य सरकारला दिली आहे. यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेमध्ये प्राण गमावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओशिवऱ्यातील एका घरासाठी 765 अर्ज, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या घरांना जोरदार मागणी ओशिवऱ्यातील एका घरासाठी 765 अर्ज, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या घरांना जोरदार मागणी
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला मिळालेल्या 370 घरांना जोरदार मागणी असल्याचे दिसतेय. 33(5) अंतर्गत या योजनेतील ओशिवरा...
संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद कायम सदस्यत्वासाठी फ्रान्सचा हिंदुस्थानला पाठिंबा
मिंधे सरकारचे थोबाड फुटले… भ्रष्टाचाराच्या मतलबी वाऱ्यामुळे कोसळला राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा!
कर्नाटकात सीबीआयला नो एण्ट्री
आरोप सार्वजनिक हितासाठीच, पण तक्रारदाराला मानसिक वेदना झाल्यात म्हणून मानहानी प्रकरणात न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवले
असा बिनकामाचा मुख्यमंत्री देशाने कधी पाहिला नसेल, मुंबईकरांच्या पाऊसकोंडीवरून आदित्य ठाकरे मिंध्यांवर बरसले
Maharashtra Assembly Election : विधानसभेची लगबग सुरू, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत