खोके सरकारचा ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; भाईंदरमधील मेळाव्यात लक्ष्मण हाके यांचा घणाघात

खोके सरकारचा ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; भाईंदरमधील मेळाव्यात लक्ष्मण हाके यांचा घणाघात

खोके सरकारने ओबीसी आरक्षण संपवून टाकण्याचा घाट घातला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यासाठी कुटील डाव खेळला जात आहे, असा घणाघात ओबीसींचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी येथे केला आहे. ओबीसी समाज आरक्षण बचाव संवाद यात्रेच्या निमित्ताने ते शहरात आले होते. यावेळी त्यांनी खोके सरकारवर कडाडून टीका केली.

खोके सरकारने फक्त ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला नाही तर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमधील आरक्षण चुकीच्या पद्धतीने कमी करून ओबीसींचे प्रतिनिधित्व कमी करण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे. यावर सत्तेतील कोणताही घटक काहीच बोलायला तयार नाही. ओबीसी आरक्षणाच्या बाजूने महाराष्ट्रातील कोणताच आमदार साधे पत्र द्यायलाही तयार नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर निवडणुकीत ओबीसी समाज चांगलाच धडा शिकवेल, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी सचिन डोईफोडे, सुधीर कांबळी, साईनाथ वाघ, डॉ. सुरेश येवले, साईनाथ बंडगर, राज बंडगर, शरद सुसलादे आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओशिवऱ्यातील एका घरासाठी 765 अर्ज, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या घरांना जोरदार मागणी ओशिवऱ्यातील एका घरासाठी 765 अर्ज, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या घरांना जोरदार मागणी
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला मिळालेल्या 370 घरांना जोरदार मागणी असल्याचे दिसतेय. 33(5) अंतर्गत या योजनेतील ओशिवरा...
संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद कायम सदस्यत्वासाठी फ्रान्सचा हिंदुस्थानला पाठिंबा
मिंधे सरकारचे थोबाड फुटले… भ्रष्टाचाराच्या मतलबी वाऱ्यामुळे कोसळला राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा!
कर्नाटकात सीबीआयला नो एण्ट्री
आरोप सार्वजनिक हितासाठीच, पण तक्रारदाराला मानसिक वेदना झाल्यात म्हणून मानहानी प्रकरणात न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवले
असा बिनकामाचा मुख्यमंत्री देशाने कधी पाहिला नसेल, मुंबईकरांच्या पाऊसकोंडीवरून आदित्य ठाकरे मिंध्यांवर बरसले
Maharashtra Assembly Election : विधानसभेची लगबग सुरू, केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत