मध्य रेल्वेचा लेट मार्क, प्रवासी हैराण
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना जवळपास रोजच आपल्या गंतव्य स्थानी पोहोचण्यास उशीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक जण याविषयी सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. आज देखील सकाळच्या वेळात कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला आपल्या गंतव्य स्थानी पोहोचण्यास उशीर झाला. कारण मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू होती. मात्र लोकल वाहतूक उशिराने होण्यामागे काय कारण आहे याची माहिती देण्यात येत नव्हती.त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List