कर्जमुक्ती योजनेची रक्कम पात्र शेतकऱयांच्या बँक खात्यात जमा झाली नाही, अजित पवार यांची कबुली
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र कर्ज खात्यांवर बँक स्तरावरील तांत्रिक अडचणींमुळे लाभ जमा झालेला नाही. तसेच ज्या शेतकऱयांना बँकेच्या चुकीच्या माहितीमुळे कमी रक्कम प्राप्त झाली होती अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र कर्ज खात्यांवर रक्कम जमा झाली नसल्याची टीका विरोधी पक्षाने वारंवार केली आहे. त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. अखेर राज्य सरकारने हे मान्य केले.
पात्र कर्ज खात्यांवर बँक स्तरावरील लाभ जमा झालेला नसल्याचे मान्य केले. राज्यातील शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. महात्मा जोतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यातील अडथळे सप्टेंबरअखेरपर्यंत दूर करण्यात येतील.केंद्रीय पणन, सहकार, कृषिमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱयांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन यांनी यावेळी दिले.
यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या व शेतजमीनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. असेही अजित पवार यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List