अमित शहा, योगी कोकणात आले तर जनता त्यांना पाणी पाजणार; भास्कर जाधवांचा इशारा

अमित शहा, योगी कोकणात आले तर जनता त्यांना पाणी पाजणार; भास्कर जाधवांचा इशारा

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात लढत होत आहे. भाजपने राणेंना उमेदवारी दिल्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत. भाजपच्या या नेत्यांच्या दौऱ्यांवरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी भाजपला इशारा दिला आहे. अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येण्याच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास येथील जनता त्यांना कोकणाचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जाधव यांनी भाजपला दिला आहे.

खाशाबा जाधव एवढेसे होते. त्यांच्यासमोर भलेमोठे परदेशी पैलवान होते. तरीही खाशाबा यांनी त्यांना पराभूत करत सुवर्णपदक पटकावले होते. विनायक राऊतही राजकारणात तसेच आहेत. अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना सांगतो की तुम्ही कोकणात यायच्या भानगडीत पडू नका. इथे आलात तरी विनायक राऊत आणि कोकणातील जनता तुम्हाला कोकणच्या मातीचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जाधव यांनी भाजपच्या या नेत्यांना दिला. विनायक राऊत आता सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना मिळणाऱ्या जनतेच्या पाठिंब्यामुळे ते विजयाची हॅटट्रिक करतील, असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्या शिवसेनेसोबत 25 वर्षे सत्ता भोगली ती शिवसेना नकली ? मोदी-शाहांवर उद्धव ठाकरेंची कडाडून टीका ज्या शिवसेनेसोबत 25 वर्षे सत्ता भोगली ती शिवसेना नकली ? मोदी-शाहांवर उद्धव ठाकरेंची कडाडून टीका
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्रामात आज देशभरात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातहा 11 मतदारसंघात आज मतदान होत आहे. मागच्या तीन टप्प्यांप्रमाणे...
घटस्फोटानंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न, सावत्र मुलगीच नाहीतर, स्वतःचा मुलगाही नाही म्हणत आई, कारण…
मनला चटका लावणारा शेवट, स्टेजवर परफॉर्म करताना प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
भर रस्त्यावर करीना कपूर-सैफ अली खानचा लिप लॉक; व्हिडीओवर भडकले नेटकरी
मी प्रिती झिंटाच्या बॉयफ्रेंडला..; ‘दिल चाहता है’ फेम अभिनेत्रीचं बऱ्याच वर्षांनंतर स्पष्टीकरण
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांसोबत आलेल्या पोलिसांच्या हातामध्ये त्या जड बॅगा कसल्या? ठाकरे गटाचा सवाल, VIDEO
Amol Kolhe : अजितदादा म्हणालेत यावेळी पाडणार, मतदानाच्या दिवशी अमोल कोल्हे म्हणाले…