मोदीजी,दहा वर्ष सेवा केलात आता तरी आमचा जीव सोडा, मार्कंडेय काटजू यांचा खोचक टोला

मोदीजी,दहा वर्ष सेवा केलात आता तरी आमचा जीव सोडा, मार्कंडेय काटजू यांचा खोचक टोला

देशभरात सध्या लोकसभा निवडइणूकीची धामधूम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात सभा घेत आहेत. विरोधकांकडून नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश मार्कंडेय काटजू यांनी शनिवारी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

”नारायण नारायण! आपण हिंदुस्तानी इतके कृतघ्न आहेत की ज्या विश्वगुरुंनी त्यांना आकाशापर्यंत पोहोचवलं, 15 लाख रुपये दिले त्यालाच हे चार जून रोजी चपला मारून बाहेर हाकलून देणार आहेत. कलयुग आले आहे, अशी खोचक पोस्ट त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

या पोस्टसोबत त्यांनी आणखी एक ट्विट करत मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतरत्न द्यायला हवा व त्यानंतर त्यांनी त्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी हिमालयात जायला हवे. यामुळे त्यांच्या स्वाभिमानालाही ठेच लागणार नाही आणि देशाला देखील त्यांच्यापासून मुक्ती मिळेल, अशी पोस्ट मार्केंडेय काटजू यांनी शेअर केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
मराठी मालिकाविश्वातून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. सृजन द...
भाजपाचे अब की बार 400 पार सोडा, देशभरातून 40 जागाही येणार नाहीत – मल्लिकार्जुन खरगे
मजुर नेणारे वाहन उलटले; 27 मजुर जखमी
यापुढे निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची घोषणा, राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत
दिल्ली विमानतळ आणि दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी
मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल…; ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर
तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन