भाजपला देशवासीयांना गुलाम बनवायचे आहे; अलिबागमध्ये इंडिया आघाडीचा मेळावा

भाजपला देशवासीयांना गुलाम बनवायचे आहे; अलिबागमध्ये इंडिया आघाडीचा मेळावा

विरोधकांना संपवून भाजपला देशात एकहाती सत्ता स्थापन करायची आहे. एकदा का हुकूमशाही राजवट आली की जनतेला ते गुलामासारखे वागवतील, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार संजय पोतनीस यांनी दिला. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी अलिबागच्या शेतकरी भवन येथे प्रमुख पदाधिकाऱयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजय पोतनीस यांनी भाजपच्या बकासुरी वृत्तीवर टीकेची झोड उठवली. ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली संविधान बदलून भाजपला स्वतःच्या मर्जीतील सत्ता राबवायची आहे. यासाठीच त्यांनी चारशे पारचा नारा दिला आहे. मात्र भाजपचा हा डाव देशातील जनता हाणून पाडेल, असा विश्वास पोतनीस यांनी व्यक्त केला. सहा वेळा खासदार राहिलेल्या अनंत गीते यांनी कधीही पदाचा दुरुपयोग केला नाही. असा हा प्रामाणिक नेता पुन्हा एकदा दिल्लीला पाठवा, असे आवाहनदेखील त्यांनी रायगडवासीयांना केले. भाजप मित्र पक्षांना नेहमीच दुय्यम वागणूक देत असतो. याचा अनुभव आम्ही स्वतः घेतला आहे. शिवसेनेला संपवण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. मात्र त्यांचा हा डाव उधळून लावण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे, असेही संजय पोतनीस यांनी सांगितले.

माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, अॅड. गौतम पाटील, पिंटय़ा ठाकूर, कविता ठाकूर, समीर ठाकूर, कमलेश खरवले, संदीप पालकर, अजय झुंझारराव तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले आधी चिमुरड्याचा गळा चिरला; नंतर डबक्यात बुडवून मारले, 10 वर्षांच्या मुलाच्या हत्येने उरण हादरले
दहा वर्षीय मुलाच्या निघृण हत्येने उरण हादरले आहे. सुरक्षारक्षकाने लहान मुलांना कंपनीत नो एण्ट्री असल्याचे सांगितल्याने पित्याने मुलाला आपल्या जवळच्या...
ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघरमध्ये महाविकास आघाडीच बाजी मारणार; भाजपच्या जुमल्यांना, गद्दारांना मतदार जागा दाखवणार
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची 60 लाखांची फसवणूक; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगर जिल्हाध्यक्षांविरुद्ध पकड वॉरंट
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांचा महाविकास आघाडीला पाठिंबा
पैसे वाटपाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे मौन
लोकलच्या गर्दीत धक्का लागून मृत्यू हा अपघातच! रेल्वे मंत्रालयाला हायकोर्टाचा दणका
पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला