नवरा-बायको दोघेही सरकारी नोकरीत असल्यास एकालाच निवडणूक ड्युटी; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

नवरा-बायको दोघेही सरकारी नोकरीत असल्यास एकालाच निवडणूक ड्युटी; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदान या आठवड्यात होणार आहे. या निवडणूकीत इलेक्शन ड्युटीबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पती-पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असल्यास दोघांनाही निवडणूक ड्युटी लावण्यात येणार नाही. दोघांपेकी एकालाच इलेक्शन ड्युटी लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील मुख्य निवडणूक कार्यालयाकडून हे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा निर्वाचन निवडणूक अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. त्यानंतर त्या दोघांपैकी एकालाच निवडणूक ड्युटी लावण्यात येणार आहे.

पती-पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असल्यास त्यांच्या समस्या लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. देशभरात 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. तर 4 जूनला मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक 44 दिवस सुरू राहणार आहे. त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी देण्यात येते. मात्र, पती-पत्नी दोघेही सरकारी नोकरीत असल्यास एकालाच निवडणूक ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात 80 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई लुटणाऱयांना जेलमध्ये पाठवू! आदित्य ठाकरे यांचा भाजप आणि मिंध्यांना इशारा मुंबई लुटणाऱयांना जेलमध्ये पाठवू! आदित्य ठाकरे यांचा भाजप आणि मिंध्यांना इशारा
मुंबईला जपणे, जोपासण्याचे काम शिवसेनेने केले आहे. बेस्ट, विजेचे माफक दर, 500 फुटांपर्यंतची घरे करमुक्त केली, मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाला...
विज्ञान-रंजन – हॅट्स ऑफ, व्हॉएजर!
राज ठाकरे परप्रांतीयांच्या लोंढय़ांवर बोलताच मिंध्यांना टेन्शन
मोदींची वाराणसीतील एकाही गावाला ना भेट, ना विचारपूस
रायबरेलीत अमित शहा यांच्या सभेत पत्रकाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सभेसाठी पैसे दिले होते का? विचारताच हल्ला
लोकशाहीवर विश्वास नसणारे भाजप सरकार हद्दपार करा; शरद पवार यांची कल्याणमध्ये विराट सभा
दिल्ली डायरी – धडधड, धाकधूक आणि घबराट…!