जालन्यातील मंठा तालुक्याला पुन्हा अवकाळीने झोडपले, पिकांचे नुकसान; घर,शाळावरील पत्रे उडाले

जालन्यातील मंठा तालुक्याला पुन्हा अवकाळीने झोडपले, पिकांचे नुकसान; घर,शाळावरील पत्रे उडाले

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील उस्वद, जयपूर, एरंडेश्वर, तळणी, देवठाणा परिसरात 12 एप्रिल रोजी सायंकाळच्या 5 वाजेच्या सुमारास वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाने झोडपले. मंठा उस्वद रोडवरील झाडे उन्मळून पडली. तर जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे संपूर्ण पत्रे लोखंडी पोल उखडून पडली असून विजेचे पोल देखील पडले. विद्युत वाहिन्या तुटल्याने या भागातील विज पुरवठा रात्रभर बंद पडल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली.

तालुक्यात पुन्हा मध्ये रात्री एक विजेच्या दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात सर्व दुर अवकाळी पावसाने झोडपले. मात्र या मोठ्या अवकाळी पाऊस कोसळत असताना वादळी वारे असल्याने फळपिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असल्याचे विडोळी येथील शेतकरी मोहनराव अवचार यांनी सांगितले. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे शेतातील मोसंबी, लिंबू,आंबा, डाळिंब, टरबूज, द्राक्ष, काकडी, खरबूज, मिरची, वांगी, बाजरी, मका, आणि भाजीपाला आदी पिकांचे अगोदरच दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकर्‍यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यातच चालू हंगामातील खरीप, रब्बी पिक विमा, दुष्काळी अनुदान,नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचं अनुदान तालुक्यातील शेतकर्‍यांना आज पर्यंत ही मिळाले नसल्याने मिंधे सरकारच्या नावाने ओरडत आहेत. रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असल्याने उस्वद व परिसरातील नागरिकांनी पाच सहा तास श्रमदान करून रस्ता खुला केला. विशेष म्हणजे आज सकाळपर्यंत प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांमध्ये सरकारबद्दल चिड निर्माण झाली आहे. तर उस्वद -मंठा – सेलू असा असल्याने रस्ता मोकळा होईपर्यंत या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सर्वात मोठी बातमी, अवकाळीचा मुंबईकरांना तडाखा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा सर्वात मोठी बातमी, अवकाळीचा मुंबईकरांना तडाखा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवून दिली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना अनेक...
Mumbai and Thane Rain | मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस, उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
जिद्दीला सलाम… फक्त पाणी पिऊन जिवंत, लास्ट स्टेजवर असतानाही मतदान; कोण आहे ही महिला?
मुंबईत वादळी पावसाचा धुमाकूळ; रेल्वे वाहतूकीचा खोळंबा, रस्ते वाहतूक संथ गतीनं
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक जण अडकल्याची भीती, 7 ते 8 जण जखमी
भाजपला बहुमत मिळणार नाही, राजकीय विश्लेषकाची पोस्ट व्हायरल
भाजपच्या उमेदवारानं मुस्लिम महिलांना ओळखपत्र मागितलं; तपासणीसाठी बुरखा हटवण्यास सांगितल्यावरून वाद