Lok Sabha Election 2024 : मोदींनी 10 वर्षांत अदानींसाठी सरकार चालवले; राहुल गांधींचा भंडाऱ्यातील सभेत हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : मोदींनी 10 वर्षांत अदानींसाठी सरकार चालवले; राहुल गांधींचा भंडाऱ्यातील सभेत हल्लाबोल

गेल्या 10 वर्षांत नरेंद्र मोदींनी निवडक अब्जाधीश उद्योगपतींसाठी सरकार चालवले आहे. यात सर्वात आघाडीवर नाव आहे ते अदानींचं. घरी गेल्यावर गुगल करून त्यांच्या शेअरच्या किमती बघा. ज्या दिवशी नरेंद्र मोदींचं सरकार आलं, त्यानंतर अदानींच्या शेअरची किंमत सातत्याने वाढत आहे. हे नरेंद्र मोदी यांचं सरकार म्हटलं जात असलं तरी सत्य हे आहे की हे अदानींच सरकार आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी भंडाऱ्यातील साकोलीमध्ये झालेल्या प्रचार सभेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

एका अब्जाधीशाचे हे सरकार आहे. सर्वकाही अदानींसाठी केले जात आहे. महाराष्ट्रात मुंबईच्या विमानतळाचे काम कुण्याचतरी हातात होते. त्याच्या सीबीआय चौकशी होते, दबाव आणला जातो, धमकावले जाते आणि जादूने काही दिवसांत ते विमानतळ अदानींकडे दिले जाते. यानंतर सर्व चौकशा बंद होतात. सीबीआय शांत होते आणि अदानी महाराष्ट्राचे सर्वात मोठे विमानतळ चालवतात, असे म्हणत राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली.

हे फक्त विमानतळांबाबत घडलेले नाही. हे बंदरांच्या बाबतीतही झाले आहे. हिंदुस्थानमधील जवळपास सर्व बंदरे अदानींच्या हातात आहेत. पायाभूत सुविधांचे प्रकल्पही अदानींकडे गेलेत. पूल आणि रस्ते बांधले जातात, फायदा अदानींचा होतो. खाणी त्यांच्याच, कोळसाही त्यांचाच, सौरउर्जा प्रकल्प त्यांचेच, वीज त्यांची. हे सर्व अदानांसाठी होतेय. त्यांच्यासोबत पाच ते दहा उद्योगपतींसाठी होत आहे, असा आरोप राहुल गांधी मोदी सरकारवर केला.

आज हिंदुस्थानात 22 असे धनाढ्य आहेत ज्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे जेवढी हिंदुस्थानमधील 70 कोटी जनतेकडे आहे. म्हणजे हिंदुस्थानच्या 50 टक्के लोकसंख्येकडे जितका पैसा आहे तितका पैसा 22 लोकांकडे आहे आणि 24 तास नरेंद्र मोदी कधी धर्मावर, कधी गरीबांवर तर कधी हिंदू-मुस्लिमांवर बोलतात. दोन जातींमध्ये भांडणं लावतात. पण त्यांचं लक्ष्य एकच आहे, तुमचा पैसा, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय? वडील चोरला, वडील चोरला म्हणता… राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला काय?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणात एकनाथ शिंदे यांनी माझे वडील चोरले असं म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा...
तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा, हीच मोदींची नीती! उद्धव ठाकरे कडाडले
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
भाजपाचे अब की बार 400 पार सोडा, देशभरातून 40 जागाही येणार नाहीत – मल्लिकार्जुन खरगे
मजुर नेणारे वाहन उलटले; 27 मजुर जखमी
यापुढे निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची घोषणा, राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत
दिल्ली विमानतळ आणि दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी